🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा- आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला आम्ही लागलो आहोत. भारिप-बहुजन महासंघ, एमआयएम आणि जनता दल मिळून वंचित बहुजन आघाडीच्या बॅनरखाली विधानसभा लढवेल. आम्ही महाराष्ट्रात कमीत कमी ५५ जागांवर विजय मिळेल असा दावा वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
‘नवभारत टाइम्स’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत प्रकाश आंबेडकर यांनी हा दावा केला आहे पुढे बोलताना आंबेडकर म्हणाले,राष्ट्रीय राजकारणात काँग्रेस मागे पडली आहे. आगामी काळातही हेच चित्र असेल. पण तरीही काँग्रेस दुसऱ्या पक्षांना पुढे येऊ देत नाही. आम्ही राष्ट्रीय राजकारणात असतो तर भाजपला नाकीनऊ आणले असते, असंही त्यांनी सांगितलं.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
