🕒 1 min read
औरंगाबाद : राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टी व मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका सोयगाव तालुक्याला बसला आहे. डोंगराळ भाग असल्याने पिकांसह जमिनी वाहून गेल्या आहेत. अनेक घरांचे नुकसान झाले असून जनावरे दगावली आहे. यामुळे संकटात सापडलेल्या बळीराजाच्या पाठीशी आम्ही खंबीर आहोत. तसेच सर्वतोपरी मदतीसाठी राज्यसरकार शेतकरी व नुकसानग्रस्तांच्या सदैव पाठीशी असल्याचे प्रतिपादन शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केले.
गेल्या काही दिवसात मराठवाड्याला जोरदार पावसाने झोडपून काढले आहे. शेतकऱ्यांचा खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी कन्नड तालुक्यातील शिवना टाकळी प्रकल्पाची पाहणी केली. यावेळी लव्हाळी, अंतापूर, टाकळी आदी गावात झालेल्या नुकसानीची घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. अतिवृष्टी व पावसाने झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याची सूचना खैरे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
पाहणीदरम्यान आमदार उदयसिंग राजपूत, शिवसेना तालुकाप्रमुख केतन काजे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, तालुकासंघटक डॉ. अण्णासाहेब शिंदे आदींसह अधिकारी व स्थानिक नागरिक उपस्थित होते. सोयगाव तालुक्यातील तिडका येथे थेट बांधवार जाऊन त्यांनी शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेतल्या आहे. यावेळी कन्नड सोयगावचे आमदार उदयसिंग राजपूत, उपजिल्हाप्रमुख अवचित वळवळे, तालुकाप्रमुख केतन काजे, शिवसैनिक- युवासैनिक उपस्थित होते.
महत्त्वाच्या बातम्या
- नर्सिंग ‘एएनएम’ अभ्यासक्रमांची उद्यापासून परीक्षा; मराठवाड्यातील २० केंद्रावर बैठक व्यवस्था
- ‘ही नौटंकी असली तरी मोदींनी यांना कुठून कुठपर्यंत आणले आहे’, राणे यांची बोचरी टीका
- येऊ कशी तशी मी..’फेम अन्विताचा ट्रेंडिग गाण्यावरचा दिलखेच ‘ठूमका’
- शेतकऱ्यांची चेष्टा केल्याप्रकरणी मंत्रिमंडळातून वडेट्टीवार यांची हकालपट्टी करा- लोणीकर
- ‘साहेब, आमची दिवाळी गोड करा; शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून मन सुन्न झाले’, फडणवीसांच्या भावना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
