Share

राज्यातील ‘या’ जिल्ह्यात ३१ मार्च पर्यंत कलम १४४ लागू

Published On: 

🕒 1 min read

औरंंगाबाद : आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ व फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ (१) (३) मधील तरतुदीनुसार औरंगाबाद जिल्ह्यासाठी (पोलीस आयुक्त (शहर) औरंगाबाद यांचे कार्यक्षेत्र वगळून) या कार्यालयाच्या या आदेशान्वये लागू केलेले मनाई आदेश यापुढे ३१ मार्च २०२१ चे २४.०० वाजेपर्यंत लागू करीत आहे. पोलीस आयुक्तालय क्षेत्राबाबत पोलीस आयुक्त (शहर) औरंगाबाद यांचे आदेश अंमलात राहील, असे प्रभारी जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाणे यांनी कळविले आहे.

शासनाच्या अधिसूचनेनुसार साथरोग अधिनियम खंड २ (१) नुसार कोविड-१९ वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यासाठी महानगर पालिका आयुक्त यांना सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. तसेच मुख्य सचिव यांचे पत्रानुसार आयुक्त महानगर पालिका औरंगाबाद यांना औरंगाबाद महानगर पालिका क्षेत्रामध्ये बाजार, दुकाने यांचे नियंत्रण करण्यासाठी प्राधिकृत करण्यात आलेले आहे. त्यानुसार औरंगाबाद महानगर पालिका क्षेत्रामध्ये लॉकडाऊनबाबत आयुक्त, महानगर पालिका औरंगाबाद यांचे आदेश लागू राहतील. सदर आदेशाचे पालन न करणाNया व्यक्ती, संस्था अथवा समूह यांचे विरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये कारवाई करण्यात येणार आहे.

दरम्यान, औरंगाबाद शहर भागात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या ३७ (१) व (३) कलमान्वये जिल्ह्याच्या शहरी हद्दीत दिनांक १४ मार्च २०२१ पर्यंत शस्त्रबंदी आणि जमावबंदी आदेश लागू केला आहे, असे डॉ. निखील गुप्ता, पोलीस आयुक्त, औरंगाबाद शहर यांनी कळविले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!