🕒 1 min read
मुंबई : यांना आरक्षण पाहिजे, आता म्हणतात ओबीसी मधून पाहिजे, उद्या म्हणतील एस सी मधून पाहिजे याचा सगळा करता करविता कोण हे सगळ्यांना चांगल माहीत आहे, असं आरोग्यमंत्री तानाजी सावंत म्हणाले होते. ज्या समितीला मराठ्यांना आरक्षण नको आहे अशी समिती त्या सरकारने स्थापन केली होती. त्यामुळे आरक्षण मिळाले नाही, असं देखील ते म्हणाले. यावरुन विरोधक आक्रमक झाले असून संभाजी ब्रिगेड यांनी सावंतांना गंभीर इशारा दिला आहे.
संभाजी ब्रिगेड यांचा तानाजी सावंत यांना इशाराः
सावंत यांनी माफी मागावी, अन्यथा त्यांची खाज उतरविल्याशिवाय राहणार नसल्याचा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला आहे. मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करावा, ही संभाजी ब्रिगेडची ३० वर्षांपासूनची मागणी आहे. कारण ती संविधानिक मागणी आहे. तानाजी सावंत यांच्यासारख्या सरंजामी आणि प्रस्थापित मराठ्यांमुळे गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळू शकलं नाही, असा निषेध संभाजी ब्रिगेडने केला आहे.
दरम्यान, तानाजी सावंतांनी माफी मागितली असून त्यांनी केलेल्या वक्तव्याने सर्वांच लक्ष वेधून घेतलं आहे. दरम्यान, 2024 पर्यंत आरक्षण नाही मिळालं तर हा तानाजी सावंत आपल्या पदाचा राजीनामा देऊन मराठा समाजाबरोबर मोर्चात तुमच्याबरोबर शामिल होईल, असं आश्वासन तानाजी सावंत यांनी दिलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Ambadas Danve । निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रकल्प इतर राज्यात हलवले; अंबादास दानवेंचा गंभीर आरोप
- Navratri 2022 | बंगालपासून गुजरातपर्यंत अशी होते नवरात्री साजरी
- Kishori Pednekar | किशोरी पेडणेकर तानाजी सावंतांवर संतापल्या, म्हणाल्या – “नालायक मंत्र्यांना…”
- Medical Device Park | बिडकीनमध्ये होणारा प्रकल्प इतर राज्यात! अंबादास दानवे आक्रमक, म्हणाले “महाराष्ट्राचे खच्चीकरण…”
- Bikes Comparison | ‘या’ दोन हिरो बाइक्स इतक्या कमी किमतीत आहेत उपलब्ध, कोणती सर्वोत्तम असेल जाणून घ्या!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
