Share

Uddhav Thackeray | महाविकास आघडी आजही एकत्र, आमच्यात फूट पडलेली नाही- उद्धव ठाकरे

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : महाराष्ट्र राज्यात शिंदे सरकार स्थापन झाल्यापासून राज्यातील राजकीय वातावरण बदललं आहे. यापुर्वी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तीन पक्ष मिळून महाविकास आघाडी सरकार राज्यात होते. परंतू आता या महाविकास आघाडीमध्ये एकप्रकारची दरी निर्माण झाली असून, ते एकत्र नसल्याचं बोललं जात आहे. अशातच याचसंदर्भात राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी वक्तव्य केलं आहे.

महाविकास आघाडी म्हणून आम्ही आजही एकत्र आहोत. आमच्यात कोणत्याच प्रकारची फूट पडलेली नसल्याचंं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. काल विधानभवनामध्ये महाविकास आघडी पक्षाची बैठक बोलवण्यात आली होती. त्यानंत त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. कोरोना सारख्या महाभयंकर महामारीचा सामना आम्ही केला आहे. त्यामुळे त्या संकटापुढे आताच संकट काहीच नाही. त्याचाही सामना करू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

सत्तासंघर्षाच्या निर्णयावर विचारले असता, न्यायदेवतेवर आपला पूर्ण विश्वास आहे. न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी असते ती निःपक्षपातीपणे निर्णय घेण्यासाठीच. त्यामुळे न्यायदेवता आणि जनता हे लोकशाहीचे दोन आधारस्तंभ जोपर्यंत मजबूत आहेत तोपर्यंत देशात लोकशाहीच राहील, बेबंदशाही टिकणार नसल्याचं ठाकरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, महविकास आघाडीच्या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील. तर शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे नेते नाना पटोले, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, भाई थोरात उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!