Share

Jitendra Awhad | “गळा घोटण्याचा प्रकार करु नका” ; सुधीर मुनगंटीवारांच्या ‘त्या’ निर्णयावर आव्हाडांची टीका

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भारतीय राज्य घटनेने दिलेल्या स्वातंत्र्याचा गळा घोटू नका, असा इशारा देत कुणी काय खावे, काय घालावे आणि आता काय बोलावे, हे तुम्ही ठरवणार का, असा प्रश्न राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना विचारला आहे. मुनगंटीवार यांनी शासकीय कार्यालयात बोलताना हॅलो ऐवजी वंदे मातरम बोलावे असे म्हटले असून तसा आदेशच त्यांनी काढला आहे. जर आम्ही तसे म्हटले नाहीतर तुम्ही आम्हाला जेलमध्ये टाकणार का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आज ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन मुनगंटीवार यांच्यावर टिका केली. भारतीय संस्कृतीमध्ये नमस्कार केला जातो आणि यातूनच संस्कृतीची सुरूवात होते. कोणी जय भीम बोलतो तर कोणी जय हिंद म्हणतो. त्यातून भावना व्यक्त होतात, त्या महत्वाच्या आहेत. पण, लोकांनी बोलायची सुरुवात कशाने करायची, हे तुम्हीच ठरविणार किंवा सांगणार का, मग तुम्हाला सुधीरजी मुनगंटीवार म्हणायचे की सुधीर मुनगंटीवारजी असे म्हणायचे किंवा भाऊ म्हणायचे हे सुद्धा तुम्ही जाहीर करून टाका, अशी टिकाही त्यांनी केली. अशीं टीका राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!