Share

Imtiyaz Jaleel । संभाजीनगर नामांतराचा सर्वसामान्य नागरिकांनी विरोध करावा – इम्तियाज जलील

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : शनिवारी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद नामांतराच्या विरोधात शहरातील विविध राजकीय संघटना, सामाजिक संघटना आणि नागरिकांनी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांना निवेदन देण्यासाठी यावे, असे आवाहन केले आहे. प्रत्येक शहराची स्वतःची अशी एक ओळख असते. त्याबरोबर तिथे राहणाऱ्या नागरिकांचे एक नाते जुळलेले असते. औरंगाबाद हे नाव गेल्या ४०० वर्षांपासून आहे, त्यामुळे राजकीय स्वार्थासाठी हे नाव बदलून संभाजीनगर नाव ठेवणे चुकीचे आहे, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

येत्या १२ तारखेला औरंगाबाद शहरात नामांतराविरोधात एक निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. त्या मोर्चात सर्व धर्मीय नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले. पुढे बोलताना जलील म्हणाले कि, “औरंगाबाद नामांतराचे षडयंत्र हे शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी केले आहे, त्याचा मी निषेध करतो. त्यासाठी एक निषेध मोर्चा काढण्यात येणार असून त्या दरम्यान विभागीय आयुक्तांना निवेदन देण्यात येणार आहे. तसेच या नामांतराविरोधात दोन प्रकारच्या लढाया लढायच्या आहेत. एक लढाई न्यायालयीन असून दुसरी लढाई हि रस्त्यावर उतरून लढावी लागणार आहे”. तर आता इम्तियाज जलील यांनी केलेल्या आवाहनाला औरंगाबादचे नागरिक प्रतिसाद देणार का हे लवकरच कळेल.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!