Share

Navneet Rana : “मागच्या सरकारला जमल नाही ते…”, शिंदे सरकारच्या मोठ्या घोषणेनंतर नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: संपूर्ण देशासह महाराष्ट्रात दीड महिन्याहून अधिक काळ पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणतीही कपात किंवा वाढ झालेली नाही. पण एकनाथ शिंदे सरकारने गुरुवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय घेत वाहनांच्या इंधनाचे दर कमी केले आहेत. शिंदे सरकारने पेट्रोलवर पाच रुपयांनी तर डिझेलवर तीन रुपयांनी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबत शिंदे सरकारने अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. यावरूनच अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी महाविकास आघाडी सरकारमधील माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

“शिंदे-फडणवीस सरकार हे  जनतेच्या हिताचे हे सरकार असून पेट्रोल -डिझेलच्या दरामध्ये कपात करण्यात आल्याने सर्वसामान्य माणसाला दिलासा मिळाला. मागच्या सरकारला जे जमल नाही ते या सरकारने केले.”, असा टोला नवनीत राणा यांनी उध्दव ठाकरे यांना लागवला आहे.

किमती कमी झाल्यानंतर मुंबईत इंधनाचे दर काय असतील

राज्य सरकारने आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी केला आहे. विशेष म्हणजे मुंबईत सध्या पेट्रोल 111.35 रुपये आणि डिझेल 97.28 रुपये प्रतिलिटर दराने विकले जात आहे. त्याचवेळी शिंदे सरकारने व्हॅटमध्ये कपात केल्यानंतर आता शहरात पेट्रोल १०६.३५ रुपयांनी तर डिझेल ९४.२८ रुपयांनी उपलब्ध होणार आहे.

  • मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे निर्णय

▪ पेट्रोलवर ५ रुपये आणि डिझेलवर ३ रुपये प्रति लिटर दर कमी करण्याचा निर्णय
▪ राज्यात “स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० अभियान” राबविण्यात येणार.
▪ केंद्र पुरस्कृत अमृत अभियान २.० (Atal Mission For Rejuvenation & Urban Transformation) राज्यात राबविणार
▪ नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या नगराध्यक्षांची निवडणूक थेट पद्धतीने घेणार
▪ राज्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंचाची ग्रामपंचायतीमधून थेट निवडणूक घेणार. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या संबंधित कलमांमध्ये सुधारणा.
▪ अध्यक्ष, उपाध्यक्ष कालावधी तीन महिन्यांपर्यंत वाढविणार. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६९ मधील कलम ४३ मध्ये सुधारणा.
▪ बाजार समितीतील सर्व शेतकऱ्यांना थेट मतदानाचा अधिकार.महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ मध्ये सुधारणा.
▪ आणीबाणीच्या कालावधीत ज्या व्यक्तींना बंदिवास सोसावा लागला, अशा व्यक्तींचा सन्मान / यथोचित गौरव करण्याची (दिनांक ३१ जुलै, २०२० रोजी बंद करण्यात आलेली ) योजना पुन्हा सुरु करणार

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!