🕒 1 min read
मुंबई : बंडखोरांविरोधात आता शिवसेनेनं आक्रमक पवित्रा घेतलेला पाहायला मिळत आहे. शिवसेनेने बंडखोरांविरोधात संघटनात्मक मेळावे घेण्यास सुरुवात केली आहे. आज मुंबईतील दहिसरमधील शिवसेना मेळाव्यात बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांसाठी कठोर शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. आमदारांना फरारी, बेईमान आणि देशद्रोही म्हणत त्यांनी राजीनामा देऊन निवडणूक लढवण्याचे आव्हान केले.
पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या बंडखोरीचे उदाहरण देत त्यांनीही शिवसेनेविरोधात बंडखोरी करून राजीनामा दिल्याचे सांगितले. आसाममधील पुरात मृतदेह तरंगत असून ते सर्व हॉटेलमध्ये मजा करत असल्याचे राऊत यांनी सांगितले. त्यांच्या विरोधात पुणे आणि मुंबईत शिवसैनिकांची निदर्शने सुरू आहेत.
संजय राऊत म्हणाले की, शिवसेनेचा एकच बाप आहे आणि तो म्हणजे बाळासाहेब ठाकरे. बंडखोर आमदारांना अनेक बाप आहेत. त्यामुळे या सर्वांनी बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने मतांची भीक मागू नये. ते म्हणाले की, काही बंडखोर आमदारांना गुवाहाटीतील हॉटेलमध्ये जबरदस्तीने ठेवण्यात आले आहे. संजय राऊत यांनी यावेळी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर जोरदार टीका केली. किरीट सोमय्या आता बेरोजगार होणार असल्याचा टोला त्यांनी लगावला.
राऊत म्हणाले की, आपण स्वत: आसामचे मुख्यमंत्री आणि पर्यटनमंत्र्यांना फोन करून सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी याच हॉटेलमधील २० खोल्या मागितल्या होत्या, मात्र त्या मिळाल्या नाहीत. ते म्हणाले की, बंडखोर आमदारांना गुवाहाटी हॉटेलमध्ये गांजा आणि अफूचे सेवन केले जात आहे. यामुळे हे सर्व आमदार आता हिंदुत्व आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल बोलत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
