🕒 1 min read
बुलढाणा : लग्न हा क्षण प्रत्येक जोडप्यासाठी आयुष्यातील सर्वांत सुंदर आणि अविस्मरणीय क्षणांपैकी एक क्षण असतो. मात्र या दिवशी अपेक्षाही केली नसेल असे काही घडले तर? असेच काहीसे झालेय ते बुलढाण्यातील एका जोडप्यासोबत. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर पांग्रा येथे एका लग्न चार वाजताचे ठरले असताना वऱ्हाडी मंडळी पोहचली आठ वाजता आणि याचक्षणी होत्याचे नव्हते झाले.
नवरीकडील मंडळींनी नवरदेव यायला उशिर का झाला, म्हणून वराकडील मंडळीला विचारणा केली असता हा वाद वेगळ्याच मुद्द्यावर पोहोचला. आणि बघता बघता हातात स्वयंपाकाचे सराटे घेऊन वराकडील वर्हाडी मंडळीला चांगलेच चोपले. त्यानंतर मुलीकडील परिवाराने लग्न लावायचेच नाही अशी रोखठोक भूमिका घेत नवरदेवाला भर मंडपातून माघारी पाठवले.
परंतु आता हळद लावलेल्या नवरीला ठेवायचे कसे या संकटात असताना वधुपित्याने शोधाशोध करून बीड येथील नात्यातील एक मुलगा बघितला आणि त्याच रात्री त्याच्यासोबत लग्न उरकून दिले. तर दुसरीकडे देऊळगाव कोळ येथील आत्याच्या मुली सोबत नवरदेवाचे देखील त्याच रात्री शुभमंगल उरकले. मात्र या घटनेने सर्वांनाच आश्चर्य वाटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “विषबाधा, भूतबाधा पेक्षाही भयंकर अशी ‘गांधी बाधा’ हिंदुस्थानला झाली आहे” ; संभाजी भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य
- संजय राऊतांच्या ‘त्या’ आरोपानंतर मोहीत कंबोज यांचे ट्वीट! म्हणाले “Dawood Ibrahim के सभी गुर्गे…”
- किरीट सोमय्या हल्ला प्रकरण; सोमय्यांच्या जखमेबाबत महत्त्वाची माहिती समोर!
- “महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट हाच अंतिम पर्याय” ; गुणरत्न सदावर्तेंचं रोखठोक विधान
- अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस CORONA POSITIVE; लसीसोबतच घेतले होते दोन बूस्टर डोस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
