🕒 1 min read
मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाडवा मेळावा आणि त्यानंतरच्या उत्तर सभेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधत जोरदार हल्ला केला. राष्ट्रवादीने राज्यात जातीचे राजकारण केल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला. यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटल्या. तर राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार (rohit pawar) यांनी ‘शरद पवार, अजित दादांवर टीका म्हणजे राज्याच्या संस्कृतीला टार्गेट करण्यासारखे आहे.’, असे म्हटले होते. यावरच आता माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत (sadabhau khot) यांनी ट्वीट करत टोला लगावला आहे.
“शरद पवार, अजित दादांवर टीका म्हणजे राज्याच्या संस्कृतीला टार्गेट करण्यासारखे इति रोहित पवार. मात्र महाराष्ट्राची संस्कृती म्हणजे स्वराज्य हाच जीव की प्राण मानणारी छत्रपती शिवाजी महाराजांची! पवार कुटुंबीयांनी कधी यावर सखोल चिंतन करावं”, असा सल्लाही सदाभाऊ खोत यांनी दिला आहे.
शरद पवार, अजित दादांवर टीका म्हणजे राज्याच्या संस्कृतीला टार्गेट करण्यासारखा – रोहित पवार @RRPSpeaks
महाराष्ट्राची संस्कृती म्हणजे स्वराज्य हाच जीव की प्राण मानणारी छत्रपती शिवाजी महाराजांची!
.
कुणा पवार कुटुंबीयांनी कधी ह्यावर सखोल चिंतन करावं— Sadabhau Khot (@Sadabhau_khot) April 18, 2022
काय म्हणाले होते रोहित पवार?
शरद पवार आणि अजित पवार यांना टार्गेट करणे म्हणजे राज्याच्या संस्कृतीला टार्गेट करणे आहे. लोकशाही मार्गाने भाजपला विजय मिळवता येत नाही, त्यामुळे सोशल मीडिया, केंद्रीय यंत्रणा हाताशी धरून, मुंबई महापालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून महाविकास आघाडीच्या नेत्यांना टार्गेट केले जात आहे. असे रोहित पवार यांनी म्हटले होते.
महत्वाच्या बातम्या:
- “मविआने वीज नाही पण विजेचा जबरदस्त धक्का…”, अतुल भातखळकरांचे टीकास्त्र
- धक्कादायक! भाजप आमदार गणेश नाईकांवर बलात्काराचा गुन्हा दाखल
- “… ही जातीय हिंसा घडवू पाहणाऱ्यांना चपराक आहे”, संजय राऊतांची टीका
- “चंद्रकांत पाटील निवडणुकीस उभे राहिले असते तर…”, संजय राऊतांचा खोचक टोला
- “चंद्रकांत पाटलांनी हिमालयात न जाता महाराष्ट्रातच राहावे कारण…”, संजय राऊतांचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
