मुंबई : प्राजक्ता माळी ही मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. प्राजक्ता माळी सध्या महाराष्ट्राची हास्य जत्रा या शोमध्ये आपल्याला दिसत असते. प्राजक्ता माळी हिने आजवर अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. तिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन देखील केले. मात्र तिचे वैयक्तिक आयुष्य देखील वादग्रस्त राहीलेले आहे. प्राजक्ता माळीने काही दिवसांपूर्वीच लग्न आणि लग्न संस्था याबद्दल आपले मत व्यक्त केले होते. प्राजक्ता माळी हिने या पोस्टमध्ये म्हटले होते की, लग्न करावे तर प्रेमविवाह करूनच करावे. नाहीतर लग्न करू नये.कुठल्याही लग्न संस्थेचा आहारी जाऊ नये, असे तिने म्हटले होते.
आता प्राजक्ता माळी हिनेदेखील महाराष्ट्राची हास्य जत्रा सोडल्याची माहिती येत आहे. याबद्दल आम्ही आपल्याला माहिती देणार आहोत. प्राजक्ता माळी हिने काही वर्षांपूर्वी ‘जुळून येती रेशिम गाठी’ ही मालिका केली होती. त्या आधी देखील तिने अनेक मालिका आणि नाटकांमध्ये देखील काम केले.
मात्र, जुळून येती रेशीम गाठी या मालिकेने तिला ओळख मिळवून दिली. प्राजक्ता माळी हिने या मालिकेमध्ये ललित प्रभाकर याच्यासोबत तिने काम केले होते. ही मालिका देखील लोकप्रिय ठरली होती. त्याचप्रमाणे नुकताच आलेल्या पावनखिंड या चित्रपटातही प्राजक्ता माळी हिने छोटी भूमिका केली आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
