अमरावती : भारतात कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जात आहे. देशात पाहिले तर विदर्भात कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मागे आणि सध्या कापूस उत्पादकांना चांगला दर मिळाला आहे. कापसाचे दर आणि उत्पादन चांगले असल्यामुळे कापूस ते कापड इथपर्यंत तयारी करण्यात आली होती. या प्रक्रियेची अंमलबजावणी झाली असती तर कापूस उत्पादकांच्या दरात आणखी वाढ झाली असती.
कापूस ते कापड हा उपक्रम राबविण्यासाठी राज्यात एकाधिकारी योजना देखील लागू करण्यात आली होती. परंतु हा उपक्रम रखडला गेला. राजकीय इच्छाशक्ती नसल्यामुळे या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात आली नाही असे विदर्भातील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. आता उत्पादन देखील वाढत आहे परंतु सरकार शेतमालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यास अपयशी ठरत आहेत असे दिसत आहे.
कापूस ते कापड या योजनेचा फायदा –
कापसापासूनच कापड तयार केले जाते. विदर्भातील दर पाहून हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. शेतकऱ्यांच्या कापसाचा दर आणि ‘कापूस ते कापड’ हि प्रक्रिया एकाच ठिकाणी केली जाईल अशी संकल्पना मांडण्यात आली होती. परंतु अंमलबजावणी झाली नाही. याचा परिणाम आता शेतकऱ्यांच्या उत्पादनावर होत आहे.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
