पुणे: केंद्रीय मंत्री रामदास आठवले पुण्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आठवलेंनी राज्यपालांनी केलेल्या त्या वक्तव्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. राज्यपालांनी जे काही विधान केले बाबासाहेब पुरंदरे आणि इतरांनी सांगितल्याप्रमाणे ते विधान केले आहे. यासंदर्भात मी राज्यपालांशी बोलणार आहे मात्र माझे एक विधान आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना गुरूची आवश्यकता नव्हती. त्यासाठी जिजाऊ खंबीर होत्या, असं रामदास आठवले म्हणाले.
यावेळी त्यांनी इतर विषयांवर देखील भाष्य केलं आहे. केंद्र सरकारतर्फे युक्रेन मध्ये अडकलेल्या नागरिकांना आणण्याचे काम सुरू आहे. जसा समुद्रामध्ये मोठा मासा छोट्या माशाला गिळंकृत करतो तसेंच हे कृत्य रशियाने केले आहे. रशियाने लवकरात लवकर युद्ध थांबावे, असंही आठवले म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
-
पुणे महापालिकेतर्फे नरेंद्र मोदींच्या दौऱ्यासाठी जय्यत तयारी
-
‘पायाला भेगा, हाताला घट्टे, हेच शेतकऱ्याच्या मुलीचे सौंदर्य’ – यशोमती ठाकूर
-
“राज्यात जशी महाविकास आघाडी झाली तशीच…” ; अमित देशमुखांचे मोठे विधान!
-
गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पारंपारिक रेला नृत्यावर धरला फेर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
