जालना: काल राज्यातील तृतीयपंथीयांच्या प्रश्नासंदर्भात मंत्रालयात बैठक झाली असून त्यांच्यावर उपचारासाठी मेडिकल कॉलेज आणि शासकीय रूग्णालयात स्वतंत्र वार्ड तसेच स्वतंत्र रूम देण्यासंदर्भात स्वतंत्र धोरण तयार करण्यासाठी आराखडा तयार करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्याना देण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. ते जालन्यात बोलत होते.
तृतीय पंथीयांना वेगवेगळ्या प्रकारच्या शस्त्रक्रिया करायच्या असून शासकीय रुग्णालयात उपचार घेताना त्यांना अनेक अडचणी येतात त्यामुळे त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालय तसेच मेडिकल कॉलेज मध्ये स्वतंत्र वार्ड तसेच रूम मिळण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आराखडा तयार करून सादर करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे देखील टोपे यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या:
-
भारताने एकतर्फी सामना जिंकला ; कर्णधार रोहित मात्र खेळांडूवर भडकला
-
‘भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडे पडण्याची भीती असल्यानेच…’ विखे पाटलांची महाविकास आघाडीवर टीका
-
रिद्धिमान साहा होऊ शकतो सस्पेंड; बीसीसीआय संघ निवडी विषयी आरोपांवर प्रश्न विचारणार
-
टेनिसला मिळणार नवा बादशाह..! युक्रेनविरुद्ध युद्ध सुरू असताना रशियाच्या मेदवेदेवचा भीमपराक्रम
-
‘भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकार सज्ज’ – नितीन गडकरी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
