Share

रोहित शर्माने सांगितले ३ खेळाडूंचे नाव जे ठरू शकतात “भावी कर्णधार”

Published On: 

मुंबई: भारताचा नवीन कर्णधार रोहित शर्माने त्याच्या कर्णधारपदाची सुरुवात विजयाने केली आहे. मात्र भारतीय क्रिकेट रसिकांना आता पासून भावी कर्णधार कोण असले याची चिंता होत आहे. रोहित शर्मा कधी दुखापत ग्रस्त झाला तर बॅकअप साठी भावी कर्णधार असावा असेही काहींचे मत आहे. या सगळ्या चर्चा सुरु असता कर्णधार रोहीतनेच यावर भाष्य केले आहे. त्याने भावी कर्णधार म्हणून तीन नावे सांगितली आहेत.

रोहित म्हणाला ” तुम्ही बुमराह, केएल राहुल आणि ऋषभ पंत यांच्याबद्दल बोलल्यास, भारताच्या यशात त्यांचा मोठा वाटा आहे, त्यांच्याकडे लीडर म्हणूनही पाहिले जाते. त्यांच्या खांद्यावर जबाबदारी आहे हे त्यांना समजले आहे, परंतु आम्हाला त्यांच्यावर दबाव आणायचा नाही कारण ते आमच्यासाठी महत्वाचे आहेत. त्यांनी खेळाचा आनंद घ्यावा आणि कौशल्ये अंमलात आणावीत अशी आमची इच्छा आहे,”

रोहितने पुढे या तिघांच्या प्रतिभेबाबतही सांगितले आहे.” त्यांना प्रत्येक गोष्ट सांगण्याची माझी तितकीशी भूमिका नाही, ते सर्व पुरेसे प्रौढ आहेत, जेव्हा त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांच्या आजूबाजूला कोणीतरी असणे आवश्यक असते, तेव्हा मला ते करण्यात अधिक आनंद होईल. आम्ही रँकमधून कसे आलो आहोत, आम्हाला दुसर्‍याने तयार केले आहे. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, प्रत्येकजण यातून जातो,”

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!