🕒 1 min read
मुंबई: मुलीच्या आत्महत्येनंतर सुरू असलेले राजकारण वाईट असून आम्हालाही जगू द्या, असे भावूक आवाहन दिशा सालियन हिच्या पालकांनी केले आहे. भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिशा सालियनच्या मृत्यूबाबत प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर या मुद्यावर पुन्हा राजकारण सुरू झाले होते. सध्या सुरू असलेल्या आरोपांमुळे आम्ही व्यथित झालो असून आमच्या जीवाचे बरं वाईट झाल्यास नेत्यांना जबाबदार ठरवण्यात यावे असेही दिशा सालियनच्या आई-वडिलांनी म्हटले.
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी राज्य महिला आयोगाच्या सदस्यांसह दिशा सालियनच्या पालकांची भेट घेतली. या भेटीमध्ये दिशा सालियनच्या आई वडिलांनी महिला आयोगाकडे तक्रार अर्ज केला. त्यानंतर दिशाच्या आई-वडिलांनी माध्यमांद्वारे आवाहन केले. दिशाच्या आई म्हणाल्या की, मुलीच्या आत्महत्येबाबत पोलिसांनी आणि संबंधित अधिकाऱ्यांना या आधीच सगळी माहिती दिली आहे. मुलीच्या आत्महत्येवर उगाच राजकारण करू नये असे आवाहनही त्यांनी केले.
सोलापुरात आज राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्यासोबत महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपली चाकणकर यांचा देखील दौरा आहे, माध्यमांशी बोलत असताना दिशा सालीयन केस प्रकरणातला सविस्तर अहवाल मालवण पोलिसांना सादर करण्याचे निर्देश दिल्याचे रुपाली चाकणकर यांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “दोन्ही काँग्रेस सोबत राहिल्यास शिवसेनेचे नुकसान”, रामदास आठवलेंचे मोठे वक्तव्य
- “तुम्ही नाव लावूच नका, तुमच्या नावातील पहिलेच शब्द खराब”, खडसेंचा गुलाबरावांवर पलटवार
- बीसीसीआयला पत्रकाराचे नाव सांगणार नाही साहा; कारण देत म्हणाला…
- वर्ल्ड कप आधीच भारतीय महिला क्रिकेटच्या स्टार खेळाडूने घेतली निवृत्ती
- दिशा सालियन प्रकरणी नितेश राणेंचा धक्कादायक दावा; म्हणाले,”सचिन वाझेंच्या मर्सिडीजमधून…”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
