Share

‘…आशांवर कारवाई करायला पाहिजे’; वर्षा गायकवाड यांची भाजपवर टीका

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्या पुण्यतिथी निमित्त राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचं ऑनलाइन व्याख्यान आयोजित केलं होतं. यावेळी त्यांनी महात्मा गांधींच्या विचारांवर भाष्य केलं आहे. गांधीजींचे विचार अजरामर आहेत आणि ते भावी पिढीलाही मार्गदर्शक ठरणार आहेत. जेथे सत्य आहे, तेथे बापूजी जीवंत आहेत, ही बाब त्यांचे विरोधकही मान्य करतील, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.

यावेळी बोलताना वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी भाजप पक्षावर देखील निशाणा साधला आहे. वर्षा गायकवाड म्हणाल्या, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचं पूजन करतात, पण त्यांच्या पक्षाची भूमिका ही वेगळी आहे, चुकीची आहे त्याचा आम्ही निषेध करतो. त्यांच्या पक्षाचे लोक महात्मा गांधी यांच्यावर गोळी झाडणाऱ्यांचं समर्थन करतात, असा आरोप वर्षा गायकवाड यांनी केला आहे.

पुढे बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या, भाजपला इतिहासाचा अभ्यास करण्याची गरज आहे. जर इतिहास पाहिला तर लक्षात येईल की गाधींनी अनेक आंदोलनं केली. सत्य कधी लपून राहत नाही. जे नथूराम गोडसे (Nathuram Godse) शौर्य दिन म्हणून साजरा करतात त्यांना काय म्हणावं, अशांवर कारवाई करायला हवी, असंही शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!