Share

“महाराष्ट्राचे पोलीस सक्षम, कुठलाही हमला होऊ शकत नाहीत”, पटोलेंनी दिली ‘त्या’ घटनेवर प्रतिक्रिया

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: जैश-ए-मोहम्मदशी संबंधित असलेल्या तरुणाने नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इमारतींची रेकी केल्याची धक्कादायक घटना घडली असतानाच आता या प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. नागपुरात रेकी करण्यासाठी आलेला २६ वर्षीय तरुण विमानाने जुलै महिन्यात नागपुरात आला होता. सीताबर्डी परिसरातील एका हॉटेलमध्ये दोन दिवस त्याचे वास्तव्य होते. आता या घटनेवरच राज्यातून प्रतिक्रिया उमटत आहेत.

दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress State President Nana Patole) यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. जैश-ए-मोहम्मदच्या हस्तकांनी आरएसएसची रेकी केल्याची माहिती यापूर्वी पोलिसांनी दिली होती हा गुप्ततेचा विषय आहे. असा कुठलाही हमला महाराष्ट्रात होऊ शकत नाही. महाराष्ट्राचे पोलीस सक्षम आहेत.’ असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.

दरम्यान यावरच विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इमारतींची जैश ए मोहम्मद कडून रेकी केली जाणे अतिशय गंभीर बाब आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. याची माहिती आता पोलिसांना आणि केंद्रीय यंत्रणांना मिळाली आहे. त्यामुळे यासंदर्भात योग्य खबरदारी महाराष्ट्राचे पोलीस आणि केंद्रीय यंत्रणा घेतील असा विश्वास आहे. याला अत्यंत गांभीर्याने घेतले पाहिजे, असं फडणवीसांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!