Share

“ताफा अडवल्यानंतर मोदींना कोणी दगड मारला की त्यांना दुखापत झाली?”

Published On: 

🕒 1 min read

चंदीगड : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) पंजाबमध्ये आले असता आंदोलकांनी त्यांचा ताफा अडवला होता. त्यामुळे मोदींना जवळपास पंधरा मिनीटे वाहनात अडकून पडावे लागले होते. यावर भाजप नेत्यांनी पंजाब सरकारवर गंभीर आरोप केले. या आरोपांना आता पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी (CM Charanjit Singh Channi) यांनी उत्तर दिले आहे.

सीएम चन्नी भाजपचे आरोप फेटाळताना म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत कोणतीच चूक झाली नाही. काय त्यांना तीथे कोणी दगड मारला, कोणी गोळी झाडली, त्यांना काही खरचटलं, की ते जखमी झाले? मग देशात त्यांनी पंप्रधानांच्या जीवाला धोका आहे असा खोटा अपप्रचार आमच्याविरोधात का केला? असा सवालही चन्नी यांनी उपस्थित केला आहे.

तसेच चन्नी यांनी सरदार पटेल यांचा एक फोटो ट्विट केला आहे. त्या फोटोखाली त्यांनी लिहीले की, ‘ज्यांना कर्तव्यापेक्षा जीवाची जास्त काळजी असते त्यांना देशाची मोठी जबाबदारी नाही घ्यायला पाहिजे’. अशी खोचक टीका मुख्यमंत्री चन्नी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेबाबतचे प्रकरण सध्या सुप्रीम कोर्टात गेले आहे. राज्यानेही याची चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. चौकशीनंतर काय ते समोर येईलच. सध्याच्या आरोप प्रत्यारोपाला पाहून हे प्रकरण अनेक दिवस गाजण्याचे चिन्हे दिसत आहेत. असेही चन्नी यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!