नवी दिल्ली : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मणक्याचा आजार असल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली होती, त्यामुळे त्यांना काही दिवस आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला उपस्थित राहू शकले नाही. यावर रावसाहेब दानवे यांनी टीका केली आहे. मुख्यमंत्री खुर्चीवर नसताना राज्य व्यवस्थित सुरुये, याचं श्रेय राज्यपालांना जाते, राज्यपालांची भूमिका सक्रिय आहे. असा टोला त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.
रावसाहेब दानवेंनी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना हा दावा केला आहे. मुख्यमंत्री खुर्चीवर नाहीत तरी राज्य व्यवस्थित सुरू आहे. खरं तर आताच राज्य व्यवस्थित सुरू आहे. त्याचं कारण आहे की राज्यपालांची भूमिका सक्रिय आहे. आता मुख्यमंत्री या राज्याचा खुर्चीवर नसताना राज्य चांगलं चाललं तर याचं श्रेय राज्यपालांना व या राज्यातील शांतता, संयमी आणि सहनशील जनतेला जातं. सरकारला नाही नाही, असा टोला रावसाहेब दानवे यांनी लगावला आहे.
दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सकाळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत विरोधकांवर टीका केली होती. त्यानंतर विरोधकांनीही त्यांना प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केल्याचे दिसून येत आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘सिंधुताई यांच्याशी खास नातं..’ म्हणत पडद्यावर सिंधुताई सपकाळ साकारणारी तेजस्विनी पंडित झाली भावूक
- विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर कोरोना पॉझिटिव्ह; ट्वीट करत दिली माहिती
- बाईकवर किस करणाऱ्या ‘त्या’ तरुणाला अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या
- “नकली घोड्यावर बसणाऱ्या ‘मैने’ला पद्म पुरस्कार दिला जातो पण…”, रोहित पवारांचा कंगनाला अप्रत्यक्ष टोला
- “सध्याच्या महाराष्ट्राला कोणी वालीआहे का?”, सदाभाऊंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
