औरंगाबाद : राज्य सरकारने मुंबईतील पाचशे चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. याच धर्तीवर औरंगाबाद शहरातील मालमत्ताधारकांनाही पाचशे चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कराला माफी मिळावी अशी मागणी सर्व पक्षीय नेत्यांकडून होत आहे.
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मुंबईतील ५०० स्क्वेअर फूट पर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफीचा निर्णय घेतला आहे. औरंगाबादेतील गुंठेवारीतील घरांचा प्रश्नही अद्याप सुटला नाही. देसाई यांच्यावर भाजप, एमआयएमने प्रश्नांची सरबत्ती केली आहे. मनपा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतल्याची टीका आ.अतुल सावे यांनी केली. तर औरंगाबादेत गरीब नाहीत का? असा सवाल खा. इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला होता.
त्यामुळे औरंगाबादेतही हा निर्णय लागू करावा, अशी मागणी जोर धरत आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने लोकप्रिय घोषणांचा सपाटा लावला आहे. मुंबईत ५०० स्क्वे. फूट घराला मालमत्ता करातून वगळण्यात यांवर आले आहे. या निर्णयामुळे लाखो रहिवाशांचा फायदा होणार आहे. मुंबईतील हा निर्णय औरंगाबादसाठी मात्र, लागू नाही. शहरात जवळपास दीड लाख सिडकोच्या घरांचा प्रश्न अद्याप सुटलेली नाही. गुंठेवारीतील घरांचा प्रश्न रेंगाळत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने निवडणूक डोळ्यासमोर ठेवलेली घोषणा आता टीकेचे लक्ष बनली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- पुणे जिल्हा बँकेवर सलग आठव्या वर्षीही अजित पवारांचेच वर्चस्व
- नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना करोनाची लागण
- “भविष्यात भाजप शिवसेनेसोबत…”; खोतकरांच्या बॅनरबाजीवर प्रवीण दरेकरांचे मोठे विधान
- ‘बड़े अच्छे..’ फेम नकुलच्या चिमुकल्यास कोरोनाची लागण
- महत्वाची बातमी! कॉर्डेलिया क्रूझवरील ६६ प्रवासी कोरोनाबाधित
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
