🕒 1 min read
नवी दिल्ली: भाजप-शिवसेना युतीच्या चर्चा पुन्हा रंगू लागल्या आहेत. शिवसेना नेते आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी युतीचे संकेत दिले असून पुढील निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार असल्याचे सांगितले. तसेच भाजप- शिवसेना युतीचा पुल फक्त केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बांधू शकतात, असं देखील सत्तार म्हणाले आहेत. अब्दुल सत्तार सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. यावेळी ते मध्यमांशी बोलत होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आजारी असल्याने विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला ते उपस्थित राहू शकले नव्हते. त्यामुळे विरोधी पक्षाने ठाकरेंवार चांगलीच टीका केली होती. तसेच उद्धव ठाकरे यांचा अन्य नेत्यांवर विश्वास नसेल, तर मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी रश्मी वहिनींकडे द्यावी, अशी खोचक टीका देखील भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली होती.
भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलेल्या त्या व्यक्तव्यानंतर शिवसेना नेते व मंत्री अब्दुल सत्तार यांनी मोठे वक्तव्यं केले आहे. अब्दुल सत्तार म्हणाले, रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) मुख्यमंत्रीपद चांगल्या प्रकारे सांभाळू शकतात. त्यांच्याकडे राज्याचे प्रमुखपद दिले तर कोणाचीही हरकत नसेल, असं वक्तव्यं अब्दुल सत्तार यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- जळगाव महामार्ग चौपदरीकरण समस्यांबाबत अब्दुल सत्तारांनी घेतली नितीन गडकरींची ‘विशेष भेट’.!
- रोमँटिक सीनसाठी अभिषेक घेतो का ऐश्वर्याचा सल्ला?
- ‘सातारा पालिकेची निवडणूक स्वबळावर लढणार’, शिवेंद्रसिंहराजेंनी केले स्पष्ट
- जितेंद्र आव्हाडांच्या ‘त्या’ वक्तव्यावर अजित पवार संतापले; म्हणाले..
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या स्वप्नातील ‘समृद्ध महाराष्ट्र’ साकार होणार-सुभाष देसाई
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
