Share

“…तरीही राज्यपाल अडथळा आणत असतील तर त्यांच्यावर दबाव आहे”, संजय राऊतांचा हल्लाबोल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला २२ डिसेंबरपासून सुरुवात झाली असून आज हे अधिवेशन संपणार आहे. आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस असूनही विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कायदेशीर मुद्दे उपस्थित करीत अध्यक्ष पदाची निवड करण्याबाबत निर्णय जाहीर केला नाही. मात्र ही निवडणूक आजच घ्यावी, या मागणीवर महाविकास आघाडीचे नेते ठाम आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यपालांवर टीका केली आहे.

संजय राऊत म्हणाले, विधानसभा अध्यक्ष निवडीसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र पाठवले आहे. विधानसभा अध्यक्षाची निवड करण्याचा अधिकार विधानसभेला आहे. तरीही राज्यपाल जर अडथळे आणत असतील तर असे वाटते की त्यांच्यावर कोणीतरी दबाव आणत आहे. भाजप राज्यपालांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन राज्य सरकारवर निशाणा साधत आहे. असे संजय राऊत यावेळी म्हणाले.

विधानसभेचे हक्क, सरकारच्या शिफारसी, लोकभावना डावलून काम करण्यासाठी राज्यपालांची नियुक्ती होत नाही. राज्यपाल अभ्यासू, विद्वान आहेत. पण त्या अभ्यासाचे आणि विद्वत्तेचे अजीर्ण होऊ नये. महाराष्ट्राच्या राजभवनामध्ये अभ्यासाचे अजीर्ण झाले आहे. अजीर्ण झाल्यावर पोटाचा त्रास सुरु होतो. असा त्रास जर काही लोकांना झाला असेल महाराष्ट्राचे आरोग्य खातं सक्षम आहे. ते उपचार करतील’ असे राऊत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!