Share

“दुखवट्याच्या नावाखाली काही लोक एसटी कर्मचाऱ्यांची दिशाभूल करत आहेत”

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांनी दिवाळीपूर्वीपासून एसटीचे विलीनीकरण या प्रमुख मागणीसाठी संप पुकारला आहे. (Maharashtra ST bus strike) तो अद्यापही सुरुच आहे. काही दिवसांपूर्वी कर्मचाऱ्यांना वेतनात ४१ टक्के वाढ दिली, विलीनीकरणासाठी समितीही नेमण्यात आली. तरीही एसटी कर्मचाऱ्यांनी लाखो प्रवाशांना वेठीस धरून संप सुरूच ठेवला आहे. याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक(Nawab Malik) यांनी यामुद्द्यावर भाष्य केले आहे.

यासंदर्भात माध्यमांशी संवाद साधतांना नवाब मलिक म्हणाले की, एसटी आंदोलन ज्या लोकांनी पुकारले होते त्यांनी माघार घेतली आहे. दुखवट्याच्या नावाखाली काही लोक दिशाभूल करत आहेत. कोर्टांनेही त्यावर ताशेरे ओढले आहेत.’

दरम्यान, एखादा वकील जर पैसे घेऊन लोकांची दिशाभूल करत असेल आणि स्वतःचे हित साध्य करत असेल, ते योग्य नाही. सरकारच्या माध्यमातून पगारवाढ करण्यात आली आहे. त्यांना विलीन करून सरकारी कर्मचारी घोषित करता येत नाही. कोणी दिशाभूल करत असेल त्याला बळी पडू नये, असे आवाहनही मलिक यांनी केले आहे. तसेच विलीनीकरणाच्या मागणीवर कर्मचारी ठाम नाहीत. काही वकील त्यांची दिशाभूल करत आहेत. हळुहळू कर्मचारी कामावर रूजू होत आहेत, असेही नवाब मलिक यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!