🕒 1 min read
मुंबई : एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील आणि एमएमआयचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी हे मुंबईत तिरंगा रॅली काढणार आहेत. मात्र, मुंबईत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. असे असतानाही शहरामध्ये रॅली काढण्याचा निर्धार इम्तियाज जलील यांनी केला आहे. त्यानुसार राज्यातून त्यांचे अनेक कार्यकर्ते मुंबईकडे निघाले आहेत.
मुंबई पोलिसांनी जमावबंदीचे आदेश लागू केल्यानंतर कार्यकर्त्यांना मुंबईच्या सीमेबाहेर रोखण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, तिरंगा रॅलीसाठी धुळ्याहून मुंबईला निघालेल्या एमआयएम कार्यकर्त्यांना पोलिसांनी मालेगावत स्थानबद्ध केले आहे.
मुंबईच्या दिशेने औरंगाबादहून एमआयएमचे कार्यकर्ते गाड्या घेऊन रवाना झाले आहेत. मुस्लीम आरक्षण आणि वक्फ मालमत्तेचे रक्षण व्हावे अशी एमआयएमची मागणी आहे. खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली एमआयएमकडून मुंबईच्या दिशेने गाड्यांची मोठी रॅली निघाली आहे. अहमदनगर येथे शहरात प्रवेश न करता शहराबाहेर असलेल्या शेंडी बाह्यवळण रस्त्यावरून शहराबाहेर जात ही रॅली पुण्याच्या दिशेने पुढे निघाली आहे.
मुंबईत रॅलीला परवानगी नाकारली असून, जमावबंदी लावण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईच्या मुलुंड चेकनाक्यावर पोलीसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच नवी मुंबईतील वाशी टोल नाक्यावर आणि मानखुर्द येथे कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- नाना पटोलेंनी राजीनामा द्यावा; चंद्रशेखर बावनकुळेंची मागणी
- ‘शरद पवारांच्या विचारांना भगवं कव्हर घातलं, अवघा रंग एक झाला’
- शरद पवारांनी सांगितला नावं लक्षात ठेवयाचा भन्नाट किस्सा, म्हणाले…
- …ही महाराष्ट्र काँग्रेसच्या इतिहासातील सर्वात वाईट घटना- चंद्रशेखर बावनकुळे
- ‘हे बाळ त्याचं नाही तर…’ ; कॉमेडियन भारती सिंहने केला खुलासा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
