Share

आरसीबीने 3 खेळाडूंना ठेवले कायम; कोहली खेळणार नव्या कर्णधाराच्या नेतृवाखाली

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : आयपीएल (ipl) च्या नव्या हंगामाच्या लिलावापूर्वी आरसीबीने कायम ठेवलेल्या तीन खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत. आरसीबीने युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि हर्षल पटेल (Harshal Patel) अशी मोठी नावे संघातून वगळली आहेत. तीन खेळाडूंपैकी एका परदेशी खेळाडूचा समावेश करण्यात आला आहे. आरसीबी (Royal Challengers Bangalore) ने स्टार स्पोर्ट्सवर त्यांच्या तीन नावांची घोषणा केली.

माजी कर्णधार विराट कोहलीला आरसीबीने १५ कोटी रुपयांमध्ये कायम ठेवले आहे. त्याच्याशिवाय ग्लेन मॅक्सवेलला 11 कोटी आणि मोहम्मद सिराजला 7 कोटींमध्ये कायम ठेवण्यात आले आहे. चौथ्या खेळाडूचा पर्यायही आरसीबीकडे होता पण त्यांनी फक्त तीन नावांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला.

आरसीबीने कायम ठेवल्यानंतर विराट कोहली म्हणाला की, ‘मी पुन्हा आरसीबीचा भाग झालो. मला आनंद आहे. मी अनेक वर्षे या संघाचे नेतृत्व केले आहे. त्याचा एक भाग असल्याचा अभिमान वाटतो. तसेच कोहलीने कायम ठेवल्याबद्दल संघाचे आभार मानले आहेत. मी मनापासून संघासोबत असेन, असे कोहली म्हणाला.

विराट कोहलीने गेल्या आयपीएलमध्ये आरसीबीचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली होती. आयपीएलच्या दुसऱ्या पर्वापूर्वी कोहलीने ही घोषणा केली होती. याचाच अर्थ कोहली आता दुसऱ्या खेळाडूच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसणार आहे. कोणाला कर्णधार बनवणार हे पाहणे बाकी आहे. याबाबत नंतर गोष्टी स्पष्ट होतील. सध्या लिलाव प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!