🕒 1 min read
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर मानेच्या आजारामुळे मुंबईतील एच.एन. रुग्णालयात शस्त्रक्रिया झाली आहे. त्यानंतर त्यांना डॉक्टरांनी काही दिवस आराम करण्याचा सल्ला दिल्याची माहिती आहे. दरम्यान यावर काळजीवाहू मुख्यमंत्री नेमण्याची मागणी काही जणांनी केली होती. आता भाजप अध्यात्मिक समन्वय आघाडीचे आर्चाय तुषार भोसले यांनी टीका केली आहे.
https://twitter.com/AcharyaBhosale/status/1465591903940845573
तुषार भोसले याबाबत ट्विट करत म्हणाले, मुख्यमंत्र्यांवरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली ; त्यांना लवकर आराम पडो मात्र दोन वर्षांपासून त्यांच्या ढिसाळ कारभारामुळे महाराष्ट्राची प्रकृती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. महाराष्ट्राला पूर्वपदावर आणण्यासाठी सुद्धा एका चांगल्या Operation (शस्त्रक्रिया) ची गरज आहे. अशी टीका तुषार भोसले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.

दरम्यान, काही दिवसांपासून काळजीवाहू मुख्यमंत्री नेमण्याची चर्चा सुरु आहे. मुख्यमंत्रिपदाचा तात्पुरता पदभार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे जाणार की नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दिला जाणार? याबाबतची जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री सुभाष देसाई, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाचा तात्पुरता प्रभार दिला जाऊ शकतो, अशी चर्चा आहे. सोशल मीडियावरही तसे मेसेज व्हायरल होत आहेत. मात्र यावर अधिकृत माहिती मंत्रालयातून देण्यात आली नाही.
महत्वाच्या बातम्या
- ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेने उचलले ‘हे’ महत्वाचे पाऊल
- ‘ओमिक्रॉन’ची पुण्यात धास्ती; शिथील झालेले नियम पुन्हा कठोर
- ‘न्यायालयाकडून थपडा खाऊनही न सुधारणारे बेशरम भ्रष्टाचारी सरकार’
- मंत्र्यांच्या ड्रायव्हरला ४० हजार आणि एसटी कर्मचाऱ्याला… – बच्चू कडू
- मुंबईतील शाळा ‘या’ तारखेपासून सुरू
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
