Share

‘मंत्री कोरोना नियम पायदळी तुडवताय, सर्वसामान्यांना मात्र आर्थिक दंडाची शिक्षा’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : रविवारी औरंगाबाद येथील एमजीएम महाविद्यालयात जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यासह नेत्यांचा सत्कार सोहळा झाला. यात एकाही मंत्र्याने मास्क परिधान केले नाही तसेच कोरोना प्रतिबंधक नियमांचीही पायमल्ली झाली. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. यावर भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे.

भातखळकर याप्रकरणी ट्विट करत म्हणाले, रविवारी औरंगाबादेत झालेल्या जाहीर कार्यक्रमात आरोग्यमंत्र्यांसह ५ मंत्र्यांच्या उपस्थितीत कोरोनाचे सर्व नियम पायदळी तुडवण्यात आले. राज्यातले मंत्री, प्रवक्ते हेच कोरोनाचे सर्व शासकीय नियम पायदळी तुडवत आहेत आणि सर्वसामान्य जनतेला मात्र त्यासाठी आर्थिक दंडाची शिक्षा केली जाते. अशी टीका अतुल भातखळकरांनी केली आहे.

या कार्यक्रमाला सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे, (Dhnanjay Munde) रोजगार कृषी आणि फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, (Sandipan Bhumre) राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul sattar) यांच्यासह आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) उपस्थित होते. येथे एकही मंत्र्यांने मास्क घातले नसल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे औरंगाबाद बहुजन विकास आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी सुनील चव्हाण (DM Sunil Chavan) यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!