Share

आम्ही राज्यातील हिंदूंची अवहेलना थांबविणार; सोमय्यांचा यशोमती ठाकूर यांना टोला

Published On: 

🕒 1 min read

अमरावती: शहरात काही दिवसांपूर्वी झालेल्या हिंसाचार आणि जाळपोळीसाठी कोण जबाबदारी आहे, यासंबंधीचे आरोप-प्रत्यारोप अनेक दिवसांपासून सुरु आहेत. त्यातच भाजप नेते किरीट सोमय्या यांनी काल अमरावती दौऱ्यावर येण्याचं सूतोवाच केल्याच्या पार्श्वभूमीवर यशोमती ठाकूर यांनी अमरावतीत येऊन त्यांना काय पुन्हा इथलं वातावरण भडकवायचं आहे का, असा सवाल केला होता. आता यावरच किरीट सोमय्या यांनी ट्वीट करत प्रतिउत्तर दिले आहे.

महाराष्ट्राचे काँग्रेस मंत्री यशोमती ठाकूर सांगतात की, किरीट सोमैया अमरावतीला येऊन काय करणार? तर आम्ही ठाकरे सरकारच्या राज्यात होत असलेली हिंदूंची अवहेलना थांबविणार. अमरावती येथे त्यांच्यावर हल्ले झाले, त्यांचा संपतीची तोडफोड करण्यात आली.आम्ही त्यांच्या सोबत उभे राहणार आहोत. असे ट्वीट करत किरीट सोमय्या यांनी यशोमती ठाकूर यांना चांगलाच टोला लगावला आहे.

दरम्यान त्रिपुरा येथील कथित हिंसाचार प्रकरणी अमरावतीत 12 नोव्हेंबर रोजी मुस्लिम समाजानं बंदचं आवाहन केलं होतं. मात्र यावेळी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरलेल्या जमावानं दुकानांची तोडफोड आणि जाळपोळ केली होती. या घटनेचा निषेध म्हणून 13 नोव्हेंबर रोजी भाजपने बंद चं आवाहन केलं होतं. या दिवशीही मोठ्या संख्येने जमाव रस्त्यावर उतरून त्यांनीदेखील हिंसक कारवाया केल्या. तेव्हापासून अमरावती शहरात तणावपूर्ण शांतता असून चार ते पाच हजार पोलीस सुव्यवस्था राखण्यासाठी तैनात आहेत. तर या सर्व दंगलींसाठी भाजप जबाबदार असल्याचा आरोप राज्याचे अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. तर भाजप नेत्यांनी या दंगलीमागे मलिकच आहेत, असा प्रत्यारोप केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!