🕒 1 min read
मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला. यावेळी राणेंनी काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या मुद्द्यांवर आपली भूमिका मांडली.
यावेळी बोलत असतांना राणेंनी काही दिवसांपूर्वी बारामतीत झालेल्या इन्क्युबेशन सेंटर उद्घाटन कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलेल्या भाषणावरून टोलेबाजी केली. यासंदर्भात बोलतांना ते म्हणाले की,’मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की फटाके वाजवा पण धूर सोडू नका आणि आवाजही करू नका. असे फटाके फक्त आघाडी सरकारच्याच दुकानात मिळतात. असाच एक धूर बारामतीला सोडण्यात आला. त्याला आवाजही नव्हता, धूरही नव्हता, फक्त वास होता. त्यामुळे लोक परत एकदा प्रदूषणाधीन झाले आहेत.’
दरम्यान, यावेळी राणेंनी मुख्यमंत्री ठाकरे सोबतच शिवसेना खासदार संजय राऊतांना यांना देखील चांगलाच टोला लगावला. ते म्हणाले की,’गेले दोन दिवस संजय राऊतांचा अग्रलेख मी वाचला. देशात विधानसभा आणि लोकसभेच्या पोटनिवडणुका झाल्या. यात एक जागा दादरा-नगर हवेलीची अपक्ष उमेदवाराने जिंकली. शिवसेनेने डंका सुरू केला की राज्याच्या बाहेर आम्ही जिंकलो. मुद्दाम मी त्या उमेदवाराची निशाणी मागवून घेतली. ती फलंदाज बॅट घेऊन उभा असल्याची आहे. पण दुसऱ्यांच्या मुलाचे बारसे करायची सवय शिवसेनेला आहेच. कमला डेलकर निवडून आल्या. त्याबद्दल शिवसेना आम्हाला यश मिळालं, आता दिल्ली काबीज करणार म्हणतायत. लिखान करताना त्या व्यक्तीला भान नसेल. रात्री जे करायचं ते दिवसा केल्यामुळे संजय राऊतांबाबत असा परिणाम होतोय का हे मला माहीत नाही’, असे राणे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- ‘ज्यांना काही समजतच नाही अशी मंडळी…’, शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया
- इंधनदर कपातीवरून शरद पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले…
- समीर वानखेडेंच्या अडचणीत भर; बनावट प्रमाणपत्रे दावून नोकरी बळकावल्याची भीम आर्मीची तक्रार
- ‘शिवसेनेनं एक निवडणूक काय जिंकली, लगेच पंतप्रधानपदाची स्वप्नं पाहायला लागलीय
- त्यांना शुभेच्छा देतो पण त्यांनी फुसके फटाके फोडू नयेत- प्रसाद लाड
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
