🕒 1 min read
हिंगोली : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. हाताशी आलेले पिक निघून गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी राज्य सरकारने लवकर निर्णय घ्यावा. तसेच कळमनुरी मतदार संघांत आणि हिंगोली जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी आमदार संतोष बांगर यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी कृषी मंत्री दादा भुसे यांची भेट घेत त्यांना या संबंधीचे निवेदन दिले. या निवेदनात त्यांनी ही मागणी केली आहे.
अतिवृष्टीमुळे कळमनुरी विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाल्याचे त्यांनी कृषी मंत्री दादा भुसे यांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच त्यांच्याकडे संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली.
या वेळी आमदार बांगर यांच्यासोबत जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती फकीरराव मुंडे, युवा सेना जिल्हाप्रमुख रामभाऊ कदम यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. हिंगोलीसह मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्य सरकारने लवकरात लवकर मदत जाहीर करण्याची मागणी करण्यात येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘खोटे बोल पण रेटून बोल’ देवेंद्र फडणवीसांच्या लातूर दौऱ्यावर काँग्रेसची टीका
- युपी सरकारच्या दडपशाही विरोधात संयुक्त विरोधी कारवाईची गरज- संजय राऊत
- शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडणाऱ्यांना फासावर लटकवा; सदाभाऊ खोत यांची मागणी
- अंमली पदार्थाच्या विक्रीविरोधात भाजप आमदारांचा मोर्चा
- ‘शिवसेना भाजपबरोबर ठरलेले लग्न मोडून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत पळून गेली अन्..’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
