🕒 1 min read
सोलापूर : आज मंगळवारी दि. ५ रोजी रयत क्रांती संघटनेकडून उसाला एकरकमी एफआरपी मिळावी, यासाठी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यानिमित्त सदाभाऊ खोत सोलापूरला आले होते. याप्रसंगी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली.
२०१९ साली विधानसभेच्या निकालानंतर शिवसेनेने ठरलेले लग्न मोडले आणि काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत पळून गेली. महायुतीने लोकसभा आणि विधानसभा एकत्र लढवली. त्यात जनतेने महायुतीला आशीर्वादही दिला. पण निकाल लागल्यानंतर शिवसेनेने हळद एकाबरोबर आणि लग्न दुसऱ्याबरोबर अशी भूमिका घेतली. भाजपबरोबर ठरलेल लग्न, साखरपुड्यासकट मोडून हळदीच्या अंगाने शिवसेना पळून गेली आणि मोकळी झाली अशी बोचरी टीका त्यांनी केली.
राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे एक जोकर आहे. महाराष्ट्रातील जनतेची करमणूक करण्याचे काम त्यांच्याकडून सुरू आहे. त्यामुळे राज्यात अतिवृष्टीमुळे जे संकट उभे टाकले आहे, त्यासाठी पंचनामे न करता सरसकट तातडीने खरीप पिकाला ६० हजार आणि बागायती पिकाला एक लाख रुपये प्रतिएकर अनुदान द्या, अशी मागणी सदाभाऊंनी केली.
तर दुसरीकडे सोमवारी देगलूर येथे भाजपच्या मेळाव्यात सदाभाऊ खोत यांनी मतदारांना अजब आवाहन केले. ‘महाविकास आघाडी सरकारमधील लोक नोटा मोजून थकली आहेत. या पोटनिवडणुकीत पैशांचा महापूर येणार आहे. लक्ष्मी आली की दरवाजा उघडा ठेवा. हे शपथ मागतात तेव्हा खोटी शपथ घ्यायची. मशीनने मोजलेले पैसे घ्यायचे, पण मतदान साबणेंना द्यायचे, असे अजब आवाहन त्यांनी केले. ‘ठाकरे सरकारने अगोदर शेतकऱ्यांना मदत द्यावी, मग मतदान मागावे. घोटभर दारू, वाटीभर रस्सा आणि पाच वर्षे बोंबलत बसा असे होऊ देऊ नका’, असा सल्लाही सदाभाऊंनी मतदारांना दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘निवृत्त नव्हे तर सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींमार्फत लखीमपूर घटनेची चौकशी करा’
- ‘निवडणूक आचारसंहितेचे कारण न दाखवता मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करा’
- “मुंबईत अंमली पदार्थांची तस्करी होत असताना महाराष्ट्राचे गृहमंत्री झोपले आहेत काय?”
- भाजपा हा पक्ष शिवसैनिकांसाठी मावशीसारखा आहे – सुभाष साबणे
- शासकीय सेवेतील पती-पत्नीवरील अन्याय दूर करा; यशोमती ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
