Share

‘शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी मी मुख्यमंत्र्यांकडे गेलो होतो पण त्यांनी भेट दिलीच नाही’; शेट्टींची जाहीर नाराजी

Published On: 

कोल्हापूर : महापूरामध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने जाहीर केलेली मदत ही तुटपुंजी असून ती देखील मिळत नसल्याने शेतकरी हे उध्वस्त झाले आहेत, असा संताप व्यक्त करत आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. यावेळी त्यांनी, मदतीचे असलेले निकष तात्काळ बदलावे आणि तातडीने शेतकऱ्यांना भरीव मदत करावी, अशी मागणी केली.

आजच्या मोर्चात हजारो शेतकरी हे सामील झाले होते. दरम्यान, त्यांनी राज्य सरकारला टोकाचा इशारा देतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर देखील जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. ‘पूरग्रस्तांना पॅकेज देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. पण अजून कसलीही मदत मिळाली नाही. मदत मिळण्यासाठी मी ठाकरे यांच्याकडे गेलो होतो पण भेट दिली गेली नाही. अजूनही मदत मिळाली नाही. पूरानं शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. त्यांनी पोराबाळांच्या शाळा, कॉलेजची फी कशी भरायची ?’ असा सवाल करत शेट्टी यांनी संताप व्यक्त केलाय.

पुढे ते म्हणाले, ‘महापुराचं एक कारण अलमट्टी धरणही आहे. तज्ज्ञ कितीही नाही म्हणत असले तरी आम्ही सिद्ध करायला तयार आहोत. लोकांची फसवणूक करण्यापेक्षा आम्ही सांगतो त्या पद्धतीनं व्यवहारिक उपाय करा. पूरग्रस्त शेतकऱ्यांचे पुनर्वसन करणार आहात की नाही? रस्ते करण्यासाठी चौपटीने पैसे देता मग पूरग्रस्तांना पैसे का देत नाही?’ असा सवाल देखील त्यांनी राज्यकर्त्यांना केलाय.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!