Share

मोदींच्या कार्यकाळात एकही भ्रष्ट्राचाराची केस समोर आली नाही, अर्थ राज्यमंत्र्यांचा दावा

Published On: 

🕒 1 min read

परभणी : देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यापासून एकही भ्रष्ट्राचाराची केस समोर आली नसल्याचा दावा केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केला आहे. नव्याने केंद्रीय मंत्रीमंडळात समावेश झालेले डॉ. कराड सध्या ‘जनआर्शिवाद’ यात्रेनिमित्त मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या लोककल्याणकारी निर्णयांची माहिती देत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर नागरिकांनी भरभरून प्रेम केले. त्यांनी देखील लोकांच्या विश्वासाला तडा जावू दिला नाही. मोंदीच्या कार्यकाळात एकही भ्रष्ट्राचाराची केस समोर आली नाही. थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले. त्यामुळे देखील भ्रष्ट्राचार कमी झाला असल्याचा दावा डॉ. कराड यांनी केला. मी देखील ‘जनआर्शिवाद’ यात्रेतून लोकांचा आर्शिवाद घेण्यासाठी आलो असल्याचे ते म्हणाले.

डॉ. भागवत कराड यांची ‘जनआर्शिवाद’ यात्रा बीड, नांदेड, हिंगोली, परभणी मार्गे जालना जिल्ह्यापर्यंत पोहोचली आहे. यापुढे जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यात ही यात्रा होणार आहे. या माध्यमातून मोदी सरकारच्या चांगल्या कामाची माहिती लोकांना देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. डॉ. कराड यांच्या रुपाने औरंगाबाद जिल्ह्याला पहिल्यांदाच केंद्रात मंत्रीपद प्राप्त झाले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!