🕒 1 min read
नवी-दिल्ली : आज(१९ ऑगस्ट) आरोग्य मंत्री राजेश टोपे पिंपरी-चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत असतांना ‘राज्यामध्ये लसीकरणाची यंत्रणा सक्षम आहे, मात्र जर लसच उपलब्ध झाली नाही तर ती दिली जात नाही.’ असे म्हणत त्यांनी लसीच्या तुटवड्यासाठी केंद्र सरकारला जबाबदार मानले आहे.
यासंदर्भात अधिक बोलत ते म्हणाले की ,’शाळा आणि कॉलेज सुरू करण्याबाबत समितीचा अहवाल चार ते पाच दिवसात अपेक्षित आहे, त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल. तसेच धार्मिक स्थळ सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील, असेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, कोरोनाच्या तिसऱ्या लाटे संदर्भात बोलतांना ते म्हणाले की, ‘सध्या तिसऱ्या लाटेच्या पार्शवभूमीवर आपण ‘वेट अँड वॉच’ च्या भूमिकेत असणार आहे. तसेच लसीकरण झाले तरी कोरोना होणार नाही असे नाही, मात्र मृत्यू होणे किंवा प्रकृती गंभीर होण्याचे प्रमाण अत्यल्प होते त्यामुळे लसीकरण महत्वाचे असल्याचे ते म्हणाले. मॉल धारकांनी त्यांच्या संपूर्ण कामगारांचे लसीकरण करून घ्यावे, असेही ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या :
- गडकरींचा तुला फोन आला नाही का? ‘भुज’च्या ‘त्या’ सीनवर अजयला कपिलने विचारला प्रश्न
- मी केवळ मराठवाड्याचा नाही तर महाराष्ट्राचा नेता– केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड
- मराठा क्रांती ठोक मोर्चा देणार येणाऱ्या काळात मुख्यमंत्री हटावचा नारा – रमेश केरे पाटील
- ‘उद्धव ठाकरे आडमार्गाने येऊन सत्तेत बसलेत; आता त्यांचे कमी दिवस उरलेत’
- ‘मोदी २०१४ लाच अफगाणिस्तानात का नाही गेले’, चाकणकरांचा खोचक सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
