🕒 1 min read
मुंबई : झी मराठीवरील लोकप्रीय मालिका ‘देवमाणुस’ नुकतीच संपुष्टात आली. काही दिवसापुर्वी १५ ऑगस्टरोजी या मालिकेचा अखेरचा भाग प्रसारीत करण्यात आला. मात्र अपेक्षेप्रमाणे या मालिकेचा शेवट दाखवण्यात आला नाही. अपुर्ण कथानकामुळे मालिकेचा पुढील भाग येणार अशी चर्चा सुरु आहे.
रहस्यमय कथानक असलेली ‘देवमाणुस’ मालिकेला प्रेक्षकांनी चांगलेच डोक्यावर उचलुन धरले होते. १५ ऑगस्ट रोजी या मालिकाच अखेरचा भाग प्रदर्शित करण्यात आला. मालिकेचा अखेरचा भाग असल्यामुळे आरोपी अजितकुमार देवचा खेळ संपणार अशी अपेक्षा चाहत्यांना होती. मात्र मालिकेच्या अखेरच्या भागात चंदाचा मृत्यु दाखवण्यात आला. डिम्पल चंदाचा खुन करुन तिचे प्रेत जाळुन टाकते. चंदाच्या बाजुला आणखी एक प्रेत जळताना दाखवण्यात आले.
त्या प्रेताच्या आजुबाजूला डॉक्टरच्या वस्तु विखुरल्या होत्या. त्यामुळे डॉक्टरचा खात्मा झाला असा सगळ्यांचा गैरसमज झाला. मात्र मालिकेच्या शेवटी डॉक्टर जिवंत आहे असे दाखवण्यात आले आहे. त्यामुळे मालिकेचा पुढील भाग येणार असल्याची माहिती समोर आली आहे. यापुर्वी झी मराठीच्या अनेक मालिकेचे सिक्वल प्रदर्शित झाले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- स्टीव्ह स्मिथ आणि ऍरोन फिंच टी-२० विश्वचषकात पुनरागमन करणार?
- ‘ मातोश्रीने करून दाखवलं ! काम केलं म्हणून उद्धव ठाकरे टॉप 5 मध्ये आले’
- ‘तुम्ही कितीही ताकद लावा शेतकरी येणार अन् बैलगाडा शर्यत होणारच’
- भारतातील मुस्लिम लॉ बोर्डाकडून तालिबानचे कौतुक
- ‘मंदिरे खुली करण्यासाठी आंदोलने करण्यापेक्षा दिल्लीतून लस आणण्यासाठी भाजपने प्रयत्न करावेत’


