Share

‘किरीट सोमय्यांनी पुढे यावं’; भावना गवळींच खुलं आव्हान

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : वाशिमच्या शिवसेना खासदार भावना गवळी आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून शाब्दिक वाद सुरू आहे. नुकतंच सोमय्या यांनी पुण्याच्या मावळमध्ये पत्रकार परिषदेत भावना गवळी यांच्यावर आरोप केले होते. गवळी यांनी केंद्र, राज्य सरकारसह बँकेचे रक्कम लाटली असा आरोप सोमय्यानी केला होता. हा गैरव्यवहार कसा केला, हे सोमवारी मुंबईत पुराव्यासह समोर आणणार असं ही सोमय्यानी जाहीर केले होते.

आता खासदार भावना गवळी यांनी त्यांच्या कार्यालयातून तब्ब्ल ७ कोटी रुपयांची रक्कम चोरीला गेल्याची तक्रार १२ मे २०२० रोजी केली होती. त्यावरुन भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी एवढी कॅश आली कुठुन, असा सवाल उपस्थित केला होता. त्यावर आता दोघांमध्ये चांगलाच शाब्दिक वाद पेटल्याचे पाहायला मिळत आहे.

किरीट सोमय्या यांनी केलेले आरोप चुकीचे आहेत, असं भावना गवळी यांनी म्हटलं आहे. इतकंच नाहीतर सोमय्या यांनी समोरासमोर यावं, असं आव्हान भावना गवळी यांनी देखील सोमय्या यांना दिलं आहे. भावना गवळी यांनी त्यांच्या कार्यालयातून, त्यांच्या उपस्थितीत ७ जुलै २०१९ रोजी सकाळी ५ वाजता ७ कोटी नगदी रोख, ११ लोकांनी चोरले, अशी तक्रार वाशीम पोलीस ठाण्यात केली होती. एवढी रोख रक्कम आली कुठून?, असा मार्मिक सवाल सोमय्या यांनी ट्विटरच्या माध्यमातून उपस्थित केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!