Share

तिसऱ्या दिवसाअखेर इंग्लंड ७० धावांची पीछाडीवर, टीम इंडिया पहिला डाव सर्वबाद २७८

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : इंग्लंड दौऱ्यातील पहिल्या कसोटी सामन्यात तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारतीय संघ ७० धावांनी आघाडीवर होता. भारतीय संघाचा पहिला डाव २७८ धावांवर अटोपला. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडने एकही गडी न गमावता २५ धावा केल्या होत्या.

नॉटींगहम कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय गोलंदाजानी चांगली कामगिरी करत इंग्लंडचा डाव १८३ धावांवर अटोपला. प्रत्युत्तरात भारतीय संघाने २७८ धावांची मजल मारली. यासह भारतीय संघाला पहिल्या डावात ९५ धावांची आघाडी मिळाली. भारताच्या डावात सलामीवीर के एल राहुलने २१४ चेंडुचा सामना करताना १२ चौकारासंह सर्वाधीक ८४ धावांची अर्धशतकी खेळी केली. अष्टपैलु रविंद्र जडेजाने त्याला पुरेपुर साथ देत ८६ चेंडुत ८ चौकार आणि १ षटकारासंह ५६ धावांची अर्धशतकी खेळी केली.

मधली फळी धावा जोडण्यात अपयशी ठरली असताना भारताच्या तळाच्या फलंदाजानी सामन्यात चांगला खेळ दाखवला. मोहम्मद शमीने १३ धावांचे आणि जसप्रीत बुमराहने ३४ चेंडुत ३ चौकार आणि १ षटकारांसह २८ धावांचे योगदान दिले. यामुळे भारतीय संघाला मोठी आघाडी घेता आली. इंग्लंडकडून पुनरागमन करणाऱ्या ओली रॉबीन्सनने सर्वाधीक ५ गडी बाद केले. जेम्स अँडरसनने ४ गडी बाद करत त्याला पुरेपुर साथ दिली. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडचे सलामीवीर रॉरी बर्न्स(११) आणि डॉमीनीक सिब्ली(९) धावांवर खेळत होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!