Share

‘भारत-पाकिस्तान चांगले शेजारी व्हावेत असं मला वाटतं, पण RSS ची विचारधारा आडवी येते…’

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली- भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध भारत स्वतंत्र झाल्यापासून आजतागायत सुधरू शकलेले नाहीत. सीमेपलीकडून वारंवार होत असलेल्या घुसखोरीच्या कारवाया आणि शस्त्रसंधीचं उल्लंघन यामुळे दोन्ही देशांमधले संबंध कायम तणावपूर्ण राहिले आहेत. मात्र, आता या सगळ्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात RSS ची विचारसरणी आडवी आल्याचा खळबळजनक दावा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केला आहे.

दक्षिण-मध्य आशिया परिषदेसाठी इम्रान खान सध्या उझबेकिस्तानमधील ताश्कंद येथे दाखल झाले आहेत. यावेळी पत्रकारांशी बोलताना इम्रान खान यांनी दोन्ही देशांमधील तणावपूर्ण संबंधांचं खापर आरएसएसवर फोडलं आहे. दहशतवाद आणि चर्चा एकाचवेळी होऊ शकते का ? असा प्रश्न विचारण्यात आला त्यावर बोलताना खान यांनी संघाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले.

‘आम्ही अनेक दिवसांपासून वाट पाहत आहोत की, भारत आणि पाकिस्तानमध्ये मैत्रीपूर्ण संबंध तयार व्हावेत. दोन्ही देश सभ्य शेजाऱ्यासारखे राहावेत. पण, करणार काय ? RSS ची विचारधारा आडवी येते…’ यानंतर त्यांना तालिबानवर तुमचा कंट्रोल नाही का ? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर इम्रान यांनी उत्तर देणं टाळलं.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!