Share

…तर एकाही मंत्र्याला राज्यात फिरता येणार नाही, वारकऱ्यांनी घेतला आक्रमक पवित्रा

Published On: 

बुलढाणा :वारकरी संप्रदायाचे उगमस्थान ज्ञानेश्वर माऊलींचे जन्म ठिकाण आपेगाव येथील दिंडी प्रस्थान सोहळ्याला परवानगी नाकारल्यामुळे महाराष्ट्रातील वारकऱ्यांनी आत्मदहनाचा निर्धार केलाय. त्यामुळे राज्यातील एकाही वारकऱ्याची आत्महत्या झाली तर हे पाप महाराष्ट्र सरकारचे असेल, असा इशारा आझाद हिंद संघटनेने दिला आहे, आणि आपेगाव च्या दिंडी प्रस्थान सोहळ्याला परवानगी द्यावी यासाठी संपूर्ण राज्यभरातून संघटनेच्या वतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात येत आहे.

तर, महाराष्ट्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे वारकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येत असेल तर सरकारच्या एकाही मंत्र्याला महाराष्ट्रात फिरणे दुरापास्त होईल असा इशारा आझाद हिंद संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड सतीशचंद्र रोठे यांनी दिला आहे.

महाराष्ट्रातील वीस दिंडी सोहळ्यांना ज्याप्रमाणे पंढरपूरच्या आषाढी एकादशीच्या सोहळ्यात सामील होण्याची परवानगी दिली. त्याचप्रमाणे शासकीय गँजेटवर 842 वर्षाची परंपरा असलेल्या ज्ञानेश्वर माऊलींच्या जन्मभूमी आपेगाव संस्थानला परवानगी देण्यात येण्याची मागणी आता जोर धरत आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!