Share

विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! औरंगाबादेत लवकरच सुरु होणार शाळा

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन कोरोना मुक्त गावात शाळा सुरू करणे शक्य असल्याने स्थानिक प्रशासनाकडून त्यादृष्टीने हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. १५ जुलैपासून कोरोमामुक्त गावातील शाळा सुरू झाल्यानंतर शहरी भागातील शाळा सुरू करण्याबाबत शासनाकडून हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. परिस्थितीचा आढावा घेऊन लवकरच शहरी भागातील शाळा सुरू करण्यात येणार आहेत. अशी माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शनिवारी (दि.११) औरंगाबादेत दिली.

लॉकडाऊन मुळे शिक्षणात खंड पडल्यामुळे बालविवाह, बालमजुरी, मुला मुलींच्या गळतीचे प्रमाण वाढले आहे. मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शासनाने ग्रामीण भागातील आठवी ते बारावी पर्यंतचे वर्ग कोरोना मुक्त गावात सुरू करण्याचे जाहीर केले. गावात प्रत्यक्ष शाळा सुरू करणे शक्य नसल्याने ऑनलाइन शाळा सुरू करण्यासाठी शासनाने परवानगी दिली होती.

आता कोरोना मुक्त गावात आठवी ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरू करण्यासाठी सुधारित शासन निर्णय जाहीर करण्यात आला. त्यानूसार १५ जुलैपासून शाळा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. कोरोना नियमांचे पालन करुन राज्यातील ग्रामीण भागातील आठवी ते बारावी पर्यंतचे वर्ग १५ जुलैपासून सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर शहरी भागातील शाळांचा मार्ग मोकळा होईल.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!