Share

‘काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे महाराष्ट्रातील पप्पू!’, चंद्रकांत पाटील यांचा टोला

Published On: 

🕒 1 min read

पुणे : इंधन दरवाढ व महागाईविरोधात काँग्रेसने काल शुक्रवारी राज्यातील सर्व महसुली आयुक्त मुख्यालयाच्या ठिकाणी सायकल रॅली काढून मोदी सरकारचा निषेध केला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली नागपुरात भर पावसात सायकल यात्रा काढण्यात आली. त्यावेळी कार्यकर्त्यांसमोर बोलताना पटोले यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले.

यावेळी त्यांनी ‘केंद्र सरकारचे अपयश झाकण्यासाठी मंत्रिमंडळातील चेहरे बदलून चालणार नाही, तर पंतप्रधानच बदलण्याची गरज आहे,’ असा टोला लगावला होता. पटोले यांच्या या वक्तव्यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पलटवार केला आहे. नाना पटोले हे महाराष्ट्रातील पप्पू आहेत अशी उपाहासात्मक टीका पाटील यांनी केली आहे.

चंद्रकांत पाटील यांनी पुणे येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, ‘नाना पटोले हे पप्पू आहेत. केंद्रात जसे एक पप्पू आहेत, तसेच महाराष्ट्रात देखील एक पप्पू आहेत. ते त्यांच्या तोंडाला येईल ते बोलत असतात’. दरम्यान, भाजपचे वरिष्ठ नेते तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा उल्लेख पप्पू करत असतात. त्यानंतर आता राज्यात पाटील यांनी पटोलेंना पप्पू म्हटले आहे. यामुळे नवीन राजकीय वाद सुरू होणारे हे मात्र निश्चित.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!