🕒 1 min read
नागपूर : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अकोला येथील कार्यक्रमात मुख्यमंत्री होण्याची इच्छा प्रदर्शित केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘मन की बात’मधून गौरविलेले अकोल्याचे मुरलीधर राऊत यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मुरलीधर राऊत यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करताना नाना पटोले यांनी मुख्यमंत्री व्हावं,अशी इच्छा व्यक्त केली होती. नाना पटोले यांनी यावेळी बोलताना मुख्यमंत्रीपदाची इच्छा जाहीर केली.
‘नाना पटोले यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. इच्छा व्यक्त करायला हरकत नाही, पण सध्या मुख्यमंत्रिपद रिकामे नाही, असा टोला राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना लगावला. ते नागपुरात माध्यमांशी बोलत होते.
‘लोकशाहीत कोणीही मुख्यमंत्री होऊ शकतो. बहुमत असलेल्या पक्षाने कोणाला मुख्यमंत्री करावे, हा त्या पक्षाचा निर्णय असतो. त्यामुळे या विषयावर मी काही बोलणे योग्य नाही. सद्यःस्थितीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला बहुमत असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. त्यामुळे सध्या तरी मुख्यमंत्रिपदाची जागा रिकामी नाही, असा टोला पटोले यांना लगावला.
शिवसेना आणि काँग्रेसने गेल्या काही दिवसांपासून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी स्वबळ आणि आघाडीची भाषा करण्यास सुरुवात केली आहे. निवडणुकांना अजून वेळ आहे. त्यावर आताच काही बोलणे शहाणपणाचे नाही, असे ते म्हणाले. राष्ट्रवादी- शिवसेना युती झाल्यास चमत्कार घडेल, असे संजय राऊत म्हणाले. त्यावर पटेल म्हणाले, की यावर काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांनी निवडणुकीसंदर्भातला निर्णय हा २०२३ नंतर घेतला जाईल, असे स्पष्ट केले आहे. यामुळे यावर आताच काही बोलता येणार नाही, असे पटेल म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- ‘…तर पुन्हा कपडे उतरवणार’ ; डब्ल्यूटीसी फायनल वर पूनम पांडेचे नवे भाष्य
- कोणत्याही आंदोलनात हाणामारी करायची वेळ आली की राणे बंधू शेपुट घालुन पळ काढतात – वैभव नाईक
- दिनेश कार्तिक बनला ‘वेदर मॅन’, स्वत:च केला खुलासा
- साऊथम्पटनमधील पिचवर ‘हा’ स्कोअर पुरेसा ; टीम इंडियाच्या कोचचं भाकीत
- रोहित आणि गील यांनी रचली 10 वर्षातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च भागिदारी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
