औरंगाबाद : कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत असली तरी तिसऱ्या लाट रोखण्यासाठी महापालिकेतर्फे तयारी केली जात आहे. त्यानुसार आगामी तीन महिन्यांसाठी ६८ कोटी रुपयांचा निधी मिळावा, असा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे. त्यात आठ कोटी ९२ लाख रुपयांची जुनी थकबाकी असल्याने एकूण ७७ कोटी ७३ लाख रुपये महापालिकेला मिळावेत, असे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.
कोरोना संसर्गाची लाट नियंत्रणात आणण्यासोबतच जे नागरिक कोरोनाबाधित आढळून आले, त्यांच्यावर उपचार करण्याचे काम महापालिकेतर्फे गेल्या दीड वर्षांपासून सुरू आहे. आरटीपीसीआर, ॲन्टीजेन चाचण्या करणे, बाधितांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करून दहा दिवस उपचार करणे, त्याठिकाणी जेवणासह इतर व्यवस्था केली जात आहे.
त्यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च होत आहे. कोरोना संसर्ग सुरू झाल्यापासून महापालिकेला आत्तापर्यंत आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत ३७ कोटी ३६ लाख, तर जिल्हा नियोजन समितीमार्फत १० कोटी १२ लाख असा ४७ कोटी ४८ लाख रुपये निधी मिळाला आहे. असे असले तरी महापालिकेला अद्याप आठ कोटी ९२ लाख रुपयांचे देणे आहे. त्यानुसार राज्य शासनाला आगामी तीन महिन्यांसाठी ७७ कोटी ७३ लाख रुपयांचा निधी मिळावा, असा प्रस्ताव पाठविण्यात आला असल्याचे आरोग्य विभागातील सूत्रांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- बीडमध्ये रेशन दुकानदारकडून लाच घेतना पुरवठा निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात
- सुखद! मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्यांच्या घरातील तीन जणांची एसटीत नियुक्ती
- पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात औरंगाबादेत बहुजन मुक्ती पार्टीचे ‘वाहनांना धक्का’ मारो आंदोलन!
- राहुल गांधींची वादग्रस्त प्रकरणी टीका आणि योगींनी संतापात राहुल गांधींची लाजच काढली !
- शासनाने दिलेला निधी कुठे कुठे खर्च झाला? ,औरंगाबाद महापालिकेत जुळवाजुळवीला सुरुवात
- ठरलं तर ! राहुल द्रविड श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाचा प्रशिक्षक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
