🕒 1 min read
औरंगाबाद : नुकताच जून महिना सुरु झाला आहे. यंदा सरासरीच्या ९९ टक्के पाऊस बरसणार असल्याचे हवामान तज्ज्ञांद्वारे सांगण्यात आले आहे. शहरातही पावसाच्या सरी बरसण्यास सुरुवात झाली आहे. मात्र आत्तापर्यंत झालेल्या दोन ते तीन पावसामध्येच शहरातील अनेक भागांमध्ये वीज गुल होत असल्याचे दिसून येत आहे. मात्र यामुळे वर्क फ्रॉम होम तसेच इतर सर्वांची देखील मोठी गैरसोय होत आहे. नुकत्याच सुरु झालेल्या पावसाळ्यामुळे सर्रास वीज जात असल्याने वादळवाऱ्यात शहरातील ९९ टक्के भाग अंधारात जाण्याची भिती निर्माण झाली आहे.
दरवर्षी पावसाळा सुरु होण्यापूर्वी महावितरणद्वारे वीज जोडणी, अनधिकृत तारा कट करणे, जोडणी इत्यादी धोकादायक कामे केली जातात. मात्र हि कामे व्यवस्थित होत नसल्याने तसेच अपुरे कर्मचारी, अयोग्य व्यवस्थापन, सुरक्षिततेची कमतरता या कारणांमुळे पावसाळा पूर्व कामे व्यवस्थित होत नाहीत. याचमुळे पावसाळ्याच्या सुरुवातीलाच बत्ती गुल होत आहे.
काल झालेल्या पावसामुळे शहरातील हर्सूल, जटवाडा, मुकुंदवाडी, पडेगाव इत्यादी भागांमध्ये वीज गायब होती. हर्सूल भागात तर रात्रभर विजेचा लपंडाव सुरु होता. येथील नागरिकांच्या म्हणण्यानुसार याठिकाणी नेहमीच पावसाळा सुरु होत नाही तो वीज जाण्यास सुरुवात होते. वीज तारांजवळ येणाऱ्या झाडांची छाटणी करणे, वीजपुरवठा करणाऱ्या उपकरणांची पाहणी करणे, झुकलेले तसेच जीर्ण विजेचे पोल दुरुस्त करणे, अशी अनेक कामे व्यवस्थित झालेली नाहीत. यातील काही कामे झाल्याचे सांगण्यात येत आहे. अनेकदा रात्री महावितरणच्या ऑफिसमध्ये कर्मचारी उपस्थित नसतात, अशीही नागरिकांची ओरड आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘…हा शब्द देतो’; गोपीनाथरावांच्या पुण्यतिथीदिनी धनंजय मुंडेंची भावुक पोस्ट !
- लातूर जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा उद्रेक! १५१ कोरोनाबाधित रुग्ण आढळले तर २५ रुग्णांचा मृत्यू
- मराठा आरक्षणाबाबत जाहीर चर्चेचं चंद्रकांत पाटील यांचे महाविकास आघाडीला आव्हान
- HSC : बारावी परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर अखेर शिक्कामोर्तब !
- इराणच्या नौसेनेला तगडा झटका; सर्वात मोठी युद्धनौका रहस्यमयरित्या बुडाली


