🕒 1 min read
नांदेड : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यातील मराठा समाजामध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून मराठा नेत्यांनी बैठका घेऊन पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जात असल्याचं सांगितलंय. तर, दुसरीकडे केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या भूमिकेवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप देखील रंगले आहेत.
खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी कोरोना काळातील गांभीर्य ओळखून संयम बाळगण्याचं आवाहन केलं होतं. मात्र, यानंतर चाललेल्या आरोप-प्रत्यारोपानंतर संभाजीराजे हे देखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणं हीच भूमिका असून आता महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये जाऊन मराठा समाजाच्या भावना समजून घेणार असल्याचं संभाजीराजे यांनी सांगितलं आहे.
संभाजीराजेंच्या महाराष्ट्र दौऱ्याची काल सुरुवात झाली. आज नांदेडमध्ये त्यांनी पत्रकारांशी संवाद साधून आपल्याभुमिकेबाबत भाष्य केलं. यावेळी त्यांनी सत्ताधारी महाविकास आघाडीसह विरोधक भाजप व इतर नेत्यांवर देखील निशाणा साधला आहे. ‘सत्ताधारी आणि विरोधक हे मराठा आरक्षणासाठी मार्ग काढण्याऐवजी एकमेकांवर टीका करण्यात व्यस्त आहेत. सर्वोच्च न्यायालयात अनेक्झरचे इंग्रजी रूपांतर करण्यासाठी एकदा नाही, तर दहादा अशोक चव्हाणांना सांगितले. पण तसं झालं नाही,’ अशी खंत संभाजीराजे यांनी व्यक्त केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- भाजपने एक डाव भुताचा टाकला तर तुम्हाला भारी पडेल; शेलारांच राऊतांना प्रत्युत्तर
- आरक्षण हक्काचं…! मुख्यमंत्री ठाकरेंसह चव्हाणांविरोधात मेटेंची उच्च न्यायालयात याचिका !
- ऐ चुप्प… लाईव्ह डिबेट शोमध्ये मराठमोळे डॉ. लेले बाबा रामदेव यांच्यावर बरसले
- कोरोनामुळे कुटुंबातील सदस्य गमावलेल्या पदाधिकाऱ्यांसाठी राज ठाकरेंनी लिहले ‘हे’ खास पत्र
- मराठा समाजाला ओबीसीत समाविष्ट केल्यास कुठलेही दुष्परिणाम होणार नाहीत – विनोद पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
