🕒 1 min read
नवी दिल्ली :भारतात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे थैमान सुरू आहे. भारतात सापडलेल्या व्हेरिंयटचा प्रसार इतर जगभरात होऊ नये म्हणून अनेक देशांनी भारतातून प्रवासास बंदी घातली आहे. पण या व्हेरियंटला भारतीय व्हेरियंट म्हणण्यावरुन केंद्र सरकारने हरकत घेतली आहे. यासंदर्भात माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाने फेसबूक, ट्विटरसारख्या सोशल मीडिया कंपन्यांना आदेश दिलाय की त्यांनी आपल्या प्लॅटफॉर्मवरुन कोरोना व्हायरसच्या भारतीय व्हेरियंटसंदर्भातील बातम्यांना काढून टाकावे.
दि. ११ मे रोजी जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं होतं की, कोरोना व्हायरसचा सर्वांत आधी भारतात आढळलेला B.1.617 व्हेरियंट हा जागतिक चिंतेचा विषय बनू शकतो. सरकारच्या वतीने सर्व सोशल मीडिया कंपन्यांना एक पत्र लिहलं आहे, ज्यात सांगण्यात आलेय की, अनेक बातम्या, लेखांमध्ये B.1.617 ला कोणत्याही आधारशिवाय तसेच तथ्याशिवाय भारतीय व्हेरियंट म्हणून सादर केलं गेलं आहे.
पत्रात म्हटलंय की, कोरोनाच्या कोणत्याही व्हेरियंटला कोणत्याही आधाराशिवाय भारतीय व्हेरियंट म्हणणं देशाची प्रतिमा खराब करणारं आहे. अशा रिपोर्ट्समुळे लोकांमध्ये चुकीचा संदेश जातो आहे. तर एका सोशल मीडिया कंपनीशी संबंधित अधिकाऱ्याने म्हटलं की, प्लॅटफॉर्मवरुन हजारो-लाखोंचा कंटेट एकावेळेस हटवणं खूपच अवघड काम आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘चक्री वादळाला लाजवेल असा दौऱ्याचा वेग होता’, मनसेचा मुख्यमंत्र्यांना टोला
- राजीव गांधींच्या मारेकऱ्यांच्या सुटकेसाठी मुख्यमंत्री स्टॅलिन यांचे राष्ट्रपतींना पत्र
- ‘आता राष्ट्रपती, पंतप्रधानांसाठी बेड्स राखीव ठेवण्याची गरज’, दिल्ली हायकोर्टाचे मत
- मोदी सरकार ‘ट्विटर’च्या भूमिकेवर नाराज, एकतर्फी निर्णय न घेण्याचा सल्ला
- सातव कुटुंबीयांच्या सांत्वनास राहुल गांधी हिंगोलीला येणार


