🕒 1 min read
मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. याच संसर्गामुळे भारतात सुरु असलेली आयपीएल स्पर्धा अर्ध्यातच स्थगित करावी लागली. यानंतर जागतीक क्रिकेटमधील महत्वाची आशीया कप ही स्पर्धाही कोरोनाच्या संसर्गामुळे रद्द करण्यात आली आहे.
आगामी जुन महिन्यात श्रीलंकेत आशिया कप स्पर्धेचे आयोजन होणार होते. मात्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ही स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय श्रीलंका क्रिकेट बोर्डाने घेतला. बुधवारी १९ मे रोजी यासंदर्भात घोषणा करण्यात आली. श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एश्ले डिसिल्वा यांनी एक निवेदन जारी करत हा निर्णय सांगितला. यात ते म्हणाले की, ‘कोरोनाची सध्या परिस्थीती पाहता आशिया कप स्पर्धा आयोजीत करणे शक्य होणार नाही. या स्पर्धेचे आयोजन २०२३ विश्वचषका नंतर होऊ शकते.’ असे ते म्हणाले.
आशिया चषक हा २०२० मध्ये टी२० विश्वचषकापूर्वी भारतात आयोजीत करण्यात येणार होता. मात्र त्याकाळात कोरोनाच्या महामारीमुळे ही स्पर्धा जून २०२१ मध्ये खेळविण्याविषयी निर्णय झाला होता. तसेही या स्पर्धेत बीसीसीआयने या स्पर्धेसाठी दुय्यम संघ पाठवला असता कारण भारतीय संघ सध्य इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. आतापर्यंतच्या झालेल्या स्पर्धेत भारतीय संघाने १९८४, १९८८, १९९०, १९९५, २०१०, २०१६ व २०१८ या हंगामात विजेतेपद पटकावेले आहे. शेवटची स्पर्धा ही २०१८ मध्ये खेळविण्यात आली होती.
महत्त्वाच्या बातम्या
- तौक्ते वादळग्रस्तांना भरीव मदत द्या; फडणवीसांची रायगड जिल्ह्यातील पाहणीनंतर मागणी
- थेरगावात चोरट्यांचा धुमाकुळ! घरांचे बाहेरहून कडी-कोंडे लावत एकाच वेळी अनेक घरांतून लुटला लाखोंचा ऐवज
- खतांच्या किंमतीत घट पण शेतकऱ्यांच्या ‘या’ मागणीसाठी प्रहारच टाली थाली आंदोलन होणारच – कडू
- बोगस डॉक्टरांवर कारवाईसाठी गेलेल्या तालुका आरोग्य अधिकाऱ्यांसह पथकावर हल्ला
- संकट काही थांबेना ; तौक्ते चक्रीवादळानंतर देशात धडकणार आता नवे ‘यास’ वादळ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
