Share

काँग्रेस नेत्यांना ढोंगीपणामुळे कायम लक्षात ठेवले जाईल; नड्डा यांचे सोनिया गांधींना पत्र

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली :  काँग्रेसच्या वतीने माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले होते. यामध्ये कोरोनाचा निपटारा करण्यासाठी त्यांनी काही उपाच सुचवले होते. त्यानंतर काँग्रेसच्या कार्यसमितीने केंद्र सरकारच्या विरोधात ठराव पास केला. आता यावर भाजपच्या वतीने पलटवार करण्यात आलाय. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये त्यांनी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यावर अनेक आरोप केले आहेत.

देशा कोरोना महामारीच्या विरोधात लढत असताना काँग्रेस लोकांची दिशाभूल करत असून भीतीचे खोटे वातावरण तयार करत असल्याचा आरोप नड्डा यांनी आपल्या पत्रात केला आहे. इतकेच नाही तर संकटाच्या काळात राहुल गांधी आणि सर्व नेत्यांनी केलेली फसवणूक आणि ढोंगीपणामुळे त्यांना कायम लक्षात ठेवले जाईल, असा आरोपही केला आहे.
काँग्रेसचे काही सदस्य लोकांची मदत करत असून त्यांचे कौतूक करावे असेच काम करत आहेत. मात्र, पक्षाचे ज्येष्ठ नेते पसरवत असलेल्या नकारात्मकतेमुळे त्यांच्या मेहनतीवर पाणी फिरत असल्याचा आरोपही नड्डा यांनी केला आहे. त्यांनी काँग्रेसच्या सर्व मुख्यमंत्र्यांवरही भीती पसरवण्याचा आरोप केलाय.

भारताच्या अलिकडच्या इतिहासात लसीकरणासंदर्भात कोणतीच शंका नव्हती. मात्र, काँग्रेसने लसीरकणावर संशय व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याच्या आकडेवारीवरुन कोणत्या राज्यात कोरोनाविरोधात व्यवस्थित काम झाले ते स्पष्ट होत असल्याचे नड्डा म्हणाले. पंजाब सारख्या राज्यांमध्ये मृत्यूदर सर्वाधिक का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!